शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण करण्यासाठी आजपासून पदयात्रा

By admin | Updated: October 1, 2015 01:47 IST

महादेवराव भुईभार यांची माहिती.

अकोला: जिल्ह्यातल्या पूर्णा नदीवरील नेरधामणा बॅरेजचे रेंगाळलेले काम तातडीने पूर्ण करण्यासाठी गुरुवार, १ ऑक्टोबरपासून तीन दिवस जिल्हा सवरेदय मंडळ व बॅरेज संघर्ष समितीच्यावतीने पदयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, कृषी कीर्तनकार तथा बॅरेज संघर्ष समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त नेरधामणा बॅरेजच्या प्रश्नावर जनजागृती करून, बॅरेजचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, तसेच खादी ग्रामोद्योग, स्वदेशी-स्वावलंबन विषयावर प्रबोधन करण्यासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता वल्लभनगर येथून या पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. १ ते ३ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या पदयात्रेत निंभोरा, गांधीग्राम, गोपाळखेड, निराट-वैराट, राजापूर, नेरधामणा बॅरेज, पाळोदी व आगर येथे गावकर्‍यांची सभा आणि संवाद साधून, नेरधामणा बॅरेज प्रश्नासह पाणी प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या पदयात्रेत नेरधामणा बॅरेजची पाहणी व संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करण्यात येणार असून, ३ ऑक्टोबर रोजी आगर येथे सामूहिक प्रार्थना व ग्रामस्थांसोबत संवाद आणि सभेनंतर पदयात्रेचा समारोप होणार आहे. या पदयात्रेत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, बॅरेज संघर्ष समितीचे सचिव भाई प्रदीप देशमुख, सवरेदय मंडळाचे कोषाध्यक्ष अँड.रामसिंह राजपूत, भूदान मंडळाचे सदस्य वसंतराव केदार आदी सहभागी होणार असल्याचे महादेवराव भुईभार यांनी सांगितले. जून २0१६ मध्ये नेरधामणा बॅरेज अंतर्गत परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतीचे ओलित झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला प्रा.राजाभाऊ देशमुख, डॉ.पी.बी.काळे, डॉ.शे.ल.जाधव, रा.सु.बोंडे, वसंतराव महातळे, प्रा. बबनराव कानकिरड, राजेश बेले उपस्थित होते.