शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेतच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:35 IST

तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अधिकार्‍यांना तंबी लोकशाही सभागृहात  भरला लोकांचा दरबार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिक तक्रारी करतात, त्यावर कार्यवाही होईल,  याचे आश्‍वासन आपण देतो; पण संबंधित नागरिकांची समस्या  सुटत नसेल, तर  शासनाच्या विषयी लोकांचे चुकीचे मत तयार  होते. तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री   डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता  दरबाराचे आयोजन  करण्यात आले होते.  या बैठकीला  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या  समवेत जिल्हा  पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी  राजेश  खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकमसह विविध विभागातील  प्रमुख उपस्थित होते.निगरुणा प्रकल्पातील पाणी  सिंचनासाठी शेतकर्‍यांना उपलब्ध  होईल का,  वृद्ध कलावंतांचे मानधान, हिवरखेड येथील रस्ते  तसेच  जॉब कार्डधारकांना  रोहयो अंतर्गत काम, अकोट शहरा तील राहुल नगर येथील पिण्याची पाइपलाइन टाकणे, पाणलोट  विकास पथकाच्या सेवा खंडित केल्याबाबत तसेच गांधीग्राम ये थील घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना नमुना ड मिळत नाही,  अशा  अनेक तक्रारी ऐकून घेत यावर संबंधित अधिकार्‍यांना दहा  दिवसात कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी  दिले.   यावेळी कला शिक्षकांसह आरोग्य, कृषी, सिंचन, शिक्षण  विभाग, महसूल विभाग, वन विभाग, विद्युत  विभाग, आदी  विभागांतील तक्रारींचे तब्बल ७२ नागरिकांची निवेदने यावेळी   पालकमंत्री डॉ.  पाटील यांना देण्यात आली. या निवेदनांवर  त्वरित  कार्यवाही करून संबंधितांच्या तक्रारीचे निरासरण  करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित का?शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत  पालकमंत्र्यांसमोर तक्रार येतातच. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य  कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांना अनुदान प्रलंबित का आहे,  याची विचारणा केली. यासंदर्भात चौकशी करून दोषींना कारणो  दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

प्राथमिक स्तरावर अधिकार्‍याकडून काय कार्यवाही करण्यात  आली, याबाबत विचारणा करण्यात आली. नागरिकांची कामे  करताना  ते काम होईल की नाही,  किती दिवसात होईल, याची   शहानिशा  यावेळी संबंधित अधिकार्‍यांकडून  करण्यात आली,  त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेतच निराकरण  होईल, याची नोंद घेतली जाईल. तसेच प्रत्येक तक्रारींचा  आढावा घेतल्या जाणार आहे.-डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री. 

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख