शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेतच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:35 IST

तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अधिकार्‍यांना तंबी लोकशाही सभागृहात  भरला लोकांचा दरबार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिक तक्रारी करतात, त्यावर कार्यवाही होईल,  याचे आश्‍वासन आपण देतो; पण संबंधित नागरिकांची समस्या  सुटत नसेल, तर  शासनाच्या विषयी लोकांचे चुकीचे मत तयार  होते. तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री   डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता  दरबाराचे आयोजन  करण्यात आले होते.  या बैठकीला  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या  समवेत जिल्हा  पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी  राजेश  खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकमसह विविध विभागातील  प्रमुख उपस्थित होते.निगरुणा प्रकल्पातील पाणी  सिंचनासाठी शेतकर्‍यांना उपलब्ध  होईल का,  वृद्ध कलावंतांचे मानधान, हिवरखेड येथील रस्ते  तसेच  जॉब कार्डधारकांना  रोहयो अंतर्गत काम, अकोट शहरा तील राहुल नगर येथील पिण्याची पाइपलाइन टाकणे, पाणलोट  विकास पथकाच्या सेवा खंडित केल्याबाबत तसेच गांधीग्राम ये थील घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना नमुना ड मिळत नाही,  अशा  अनेक तक्रारी ऐकून घेत यावर संबंधित अधिकार्‍यांना दहा  दिवसात कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी  दिले.   यावेळी कला शिक्षकांसह आरोग्य, कृषी, सिंचन, शिक्षण  विभाग, महसूल विभाग, वन विभाग, विद्युत  विभाग, आदी  विभागांतील तक्रारींचे तब्बल ७२ नागरिकांची निवेदने यावेळी   पालकमंत्री डॉ.  पाटील यांना देण्यात आली. या निवेदनांवर  त्वरित  कार्यवाही करून संबंधितांच्या तक्रारीचे निरासरण  करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित का?शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत  पालकमंत्र्यांसमोर तक्रार येतातच. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य  कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांना अनुदान प्रलंबित का आहे,  याची विचारणा केली. यासंदर्भात चौकशी करून दोषींना कारणो  दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

प्राथमिक स्तरावर अधिकार्‍याकडून काय कार्यवाही करण्यात  आली, याबाबत विचारणा करण्यात आली. नागरिकांची कामे  करताना  ते काम होईल की नाही,  किती दिवसात होईल, याची   शहानिशा  यावेळी संबंधित अधिकार्‍यांकडून  करण्यात आली,  त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेतच निराकरण  होईल, याची नोंद घेतली जाईल. तसेच प्रत्येक तक्रारींचा  आढावा घेतल्या जाणार आहे.-डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री. 

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख