शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
4
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
5
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
6
यंदा आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
7
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
8
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
9
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
10
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
12
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
महेश भट आणि पूजा भटच्या लिप किसवर पहिल्यांदाच बोलला त्यांचा मुलगा, म्हणाला- "हे मी लहानपणासून बघत आलोय..."
15
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
16
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
17
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
18
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
19
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
20
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा

नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेतच पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 01:35 IST

तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची अधिकार्‍यांना तंबी लोकशाही सभागृहात  भरला लोकांचा दरबार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागरिक तक्रारी करतात, त्यावर कार्यवाही होईल,  याचे आश्‍वासन आपण देतो; पण संबंधित नागरिकांची समस्या  सुटत नसेल, तर  शासनाच्या विषयी लोकांचे चुकीचे मत तयार  होते. तक्रारी ऐकून घ्या, समस्येचे निराकरण तत्काळ होत असेल  तर प्रलंबित ठेवू नका, केवळ प्रशासकीय उत्तरे देऊ नका, आज  आलेल्या तक्रारीची दखल घेऊन किती दिवसात तिचा निपटारा  होईल, ते आताच सांगा अन् दिलेल्या वेळेतच तक्रारींचा निपटारा  झाला पाहिजे, पुढच्या सोमवारी पुन्हा आढावा घेईल, या शब्दात  पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी अधिकार्‍यांना तंबी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पालकमंत्री   डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जनता  दरबाराचे आयोजन  करण्यात आले होते.  या बैठकीला  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या  समवेत जिल्हा  पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, अपर जिल्हाधिकारी  राजेश  खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा  अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकमसह विविध विभागातील  प्रमुख उपस्थित होते.निगरुणा प्रकल्पातील पाणी  सिंचनासाठी शेतकर्‍यांना उपलब्ध  होईल का,  वृद्ध कलावंतांचे मानधान, हिवरखेड येथील रस्ते  तसेच  जॉब कार्डधारकांना  रोहयो अंतर्गत काम, अकोट शहरा तील राहुल नगर येथील पिण्याची पाइपलाइन टाकणे, पाणलोट  विकास पथकाच्या सेवा खंडित केल्याबाबत तसेच गांधीग्राम ये थील घरकुल योजनेचा लाभार्थ्यांना नमुना ड मिळत नाही,  अशा  अनेक तक्रारी ऐकून घेत यावर संबंधित अधिकार्‍यांना दहा  दिवसात कार्यवाहीचे निर्देश पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी  दिले.   यावेळी कला शिक्षकांसह आरोग्य, कृषी, सिंचन, शिक्षण  विभाग, महसूल विभाग, वन विभाग, विद्युत  विभाग, आदी  विभागांतील तक्रारींचे तब्बल ७२ नागरिकांची निवेदने यावेळी   पालकमंत्री डॉ.  पाटील यांना देण्यात आली. या निवेदनांवर  त्वरित  कार्यवाही करून संबंधितांच्या तक्रारीचे निरासरण  करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित का?शालेय पोषण आहाराचे अनुदान प्रलंबित असल्याबाबत  पालकमंत्र्यांसमोर तक्रार येतातच. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य  कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांना अनुदान प्रलंबित का आहे,  याची विचारणा केली. यासंदर्भात चौकशी करून दोषींना कारणो  दाखवा नोटीस बजावण्याचेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 

प्राथमिक स्तरावर अधिकार्‍याकडून काय कार्यवाही करण्यात  आली, याबाबत विचारणा करण्यात आली. नागरिकांची कामे  करताना  ते काम होईल की नाही,  किती दिवसात होईल, याची   शहानिशा  यावेळी संबंधित अधिकार्‍यांकडून  करण्यात आली,  त्यामुळे आलेल्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेतच निराकरण  होईल, याची नोंद घेतली जाईल. तसेच प्रत्येक तक्रारींचा  आढावा घेतल्या जाणार आहे.-डॉ.रणजित पाटील, पालकमंत्री. 

टॅग्स :Ranjit Deshmukhरणजित देशमुख