शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कर्ज वाटप पूर्ण करा; अन्यथा शासकीय व्यवहार करणार नाही - जिल्हाधिकाऱ्यांचा बँकांना ‘अल्टीमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:33 IST

अकोला : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जाचे वाटप पूर्ण करा, अन्यथा कर्ज वाटपात दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम ’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला.

अकोला : कर्जमाफी योजनेत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जाचे वाटप पूर्ण करा, अन्यथा कर्ज वाटपात दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्ह्यातील बँकांना दिला.कर्जमाफी योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यात १ लाख १५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले सर्व शेतकरी यावर्षी पीक कर्ज वाटपासाठी पात्र आहेत. पात्र शेतकºयांना नवीन पीक कर्ज वाटप करणे गरजेचे आहे; मात्र जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यानुषंगाने पीक कर्ज वाटप योजनेच्या अंमलबजावणीकडे यावर्षी जिल्ह्यातील बँका हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून, पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना १८ जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पीक कर्ज वाटपाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, अन्यथा या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा ‘अल्टीमेटम ’ जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला.बँकांच्या अकार्यक्षमकार्यपद्धतीवर खेद !जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १३ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. बँकांच्या अशा अकार्यक्षम कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाची प्रतिमा मलीन होत आहे, ही खेदाची बाब असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी बँकांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे काम १८ जूनपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अन्यथा या कामात दुर्लक्ष करणाऱ्यां  बँकांसोबत यापुढे कोणताही शासकीय व्यवहार करण्यात येणार नाही, असा अल्टीमेटम जिल्ह्यातील बँकांना दिला आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय