शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कारभाराच्या चौकशीसाठी कृषी राज्यमंत्र्यांकडे तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:22 IST

कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या गलथान कारभाराची चौकशी करण्यासाठी बैठक बोलवावी आणि चौकशी समिती गठित करावी, यासोबतच निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील कारभाराची चौकशी करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केली आहे.त्यांच्या तक्रारीमध्ये निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयाची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. विद्यालयाकडे असलेली ६७ हेक्टरपैकी ३५ हेक्टर जमीन पडीत आहे. चराईसाठी चोवीस एकर जमीन राखीव असताना जनावरे कृश झाली आहेत. त्यांना जखमा झाल्या असून, पिण्याच्या पाण्याचीसुद्धा सोय नाही. कृषी तंत्र विद्यालयावर विद्यापीठाचे नियंत्रण नसल्यामुळे प्राचार्य-प्राध्यापकांमध्ये वाद आहेत. यासोबतच कृषी विद्यापीठाचे यंदा मानांकन घसरले आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी १३.५३ कोटी रुपयांच्या निविदा बोलाविण्यात आल्या. यात अनियमिततेचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. सुधारित निविदा प्रक्रिया राबविण्याचे कार्यकारी परिषद सदस्यांनी सांगितल्यावरही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण प्रकल्पावर अनियमित खर्च करण्यात आला आहे. खर्च करताना नियमाचे उल्लंघन करण्यात आले आहे. संशोधनातील खोटी आकडेवारी दाखविण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही विनायक सरनाईक यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे. (प्रतिनिधी)

काय आहे तक्रारीत!कृषी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना चांगली वागणूक न देता, चुकीचा सल्ला देतात. प्रशिक्षणामध्ये खोटी आकडेवारी दाखविण्यात येते. विद्यापीठ मुख्यालयी शेतकऱ्यांना राहणाºया निवास व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. विद्यापीठाचे शेतकरी माहिती केंद्र, टोल फ्री क्रमांक फक्त नावापुरतेच आहेत. नियमाप्रमाणे आर.आर.सी.मध्ये कमीत कमी दोन वर्षे झालेल्या प्रयोगांचा अंतर्भाव करणे आवश्यक आहे आणि बोर्ड आॅफ स्टडीमध्ये विद्यार्थ्यांनी एक वर्ष केलेल्या प्रयोगांचा समावेश होतो; परंतु आर.आर.सी.मध्ये विद्यार्थ्यांनी पदवीसाठी केलेल्या अभ्यासाचा समावेश करून संशोधनाची खोटी आकडेवारी फुगवून दाखविण्यात येते. त्यामुळे संशोधनाचा दर्जा खालावला आहे, असे गंभीर आरोप कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक सरनाईक यांनी केले आहेत.

 

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkolaअकोलाSadabhau Khotसदाभाउ खोत