शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

कृषी विभागाची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 02:19 IST

बोर्डी येथील वांझोटी केळी रोपे प्रकरण; आंबोडा येथील गुन्ह्यात होणार समावेश.

आकोट: बोगस व निकृष्ट दर्जाच्या केळी रोपांचा पुरवठा केल्यामुळे आकोट तालुक्यातील बोर्डी येथील केळी उत्पादक शेतकर्‍यांचे एकूण ४४ लाख ४४ हजार ३७३ रुपयांचे नुकसान झाल्याने याप्रकरणी कायदेशीर कारवाईसाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने सोमवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यापूर्वी आंबोडा येथील केळी उत्पादक शेतकर्‍यांची २४ लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बोर्डी येथील तक्रारही आंबोडा येथील गुन्हय़ात समाविष्ट करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बोर्डी येथील शेतकर्‍यांनी रमेश रामचंद्र आकोटकरकडे इंद्रायणी कंपनीच्या रोपांची मागणी नोंदविली होती. यासाठी शेतकर्‍यांनी अग्रीम रकमेचाही भरणा केला; मात्र त्यांना पुसद येथील वसंत बायोटेकची पावती देण्यात आली. त्यामुळे शेतकर्‍यांनी आकोटकरला जाब विचारला. ह्यइंद्रायणी कंपनीचे कंद वसंत बायोटेक व खेड येथील माउली हायटेक नर्सरीकडे प्रोसेसिंगसाठी पाठविले असल्याने पावती वसंत बायोटेक किंवा माउलीच्या नावे द्यावी लागते. रोपे ही इंद्रायणी कंपनीचीच देण्यात येतील,ह्ण असे शेतकर्‍यांना सांगण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाची रोपे देऊन फसवणूक केल्याचे समोर आले असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. त्यांनी आता जी-९ या जातीच्या वाणाची लागवड केली होती. केळीची वाढ खुंटली!केळीच्या पिकावर रोपे खरेदी, ड्रिंचिंग, फवारणी, खत, मजुरी व इतर मशागतीवर शेतकर्‍यांनी भरपूर खर्च केला; मात्र केळीच्या झाडांना केवळ चार ते पाच फण्यांचे घड लागले. सदर बाबसुद्धा त्यांनी रमेश आकोटकरांना कळविली होती; मात्र त्यांनी वातावरणाच्या दोषामुळे केळीच्या झाडांवर परिणाम होत असल्याचे आम्हाला सांगितले होते. शेतकर्‍यांनी बोर्डी येथील दुसर्‍या कंपनीकडून घेतलेल्या केळीच्या रोपांची वाढ, बाग उत्तम असल्याचे सांगितले. या दुसर्‍या कंपनीने दिलेल्या रोपांवर वातावरणाचा परिणाम का झाला नाही, असा सवाल शेतकर्‍यांनी उपस्थित केला. यावर आकोटकरांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.