शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: August 30, 2016 02:02 IST

हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू असल्याचा आरोप.

अकोला, दि. २९: शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे येथील एका व्यावसायिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा आरोप करीत पोलिसांच्या या दडपशाहीची आ. गोवर्धन शर्मा आणि आ. रणधीर सावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या दोन्ही आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांचा हिंदूंच्या धार्मिक सण-उत्सवामध्ये अतिरेक वाढतच असल्याचीही माहिती यावेळी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिली. हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू केली आहे. शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून हा प्रकार तत्काळ रोखण्यात यावा, अशी मागणीही शर्मा आणि सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोमवारी केली. राजराजेश्‍वराचा पालखी कावड यात्रा महोत्सव शांततेत सुरू असताना आणि कोणतेही कारण नसताना बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यास पोलीस प्रशासनाने भाग पाडले. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी केलेल्या अतिरेकी कारवाईमुळे शिवाजी पार्क येथील व्यावसायिक प्रकाश अंबादास येळमे (६१) यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचेही आ. गोवर्धन शर्मा व आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून हा प्रकार सुरू असून सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अकोला पोलीस करीत असल्याचा आरोपही या दोन आमदारांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. येणार्‍या काळात गणपती तसेच नवरात्रामध्येसुद्धा असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन सरकारविरुद्ध अशा प्रकारचे कृत्य करून जनभावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असून यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचेही या दोन आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले.न्यायालयात निर्दोष सुटलेले तडीपार शहरातील काही युवकांना तडीपार करण्यात आले आहे. ज्या युवकांनी दीड ते दोन वर्ष कारागृहात काढल्यानंतर ते निर्दोष सुटले अशा युवकांना वेठीस धरण्यासाठी त्यांना तब्बल दोन वर्षांंसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या नावाखाली हिंदू धर्मीयांना वेठीस धरण्याचा सपाटाच लावला असून यावर तातडीने अंकुश मिळविण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावे, असेही आ. शर्मा व सावरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले.