शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By admin | Updated: August 30, 2016 02:02 IST

हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू असल्याचा आरोप.

अकोला, दि. २९: शिवाजी पार्क परिसरात पोलिसांनी केलेल्या दडपशाहीमुळे येथील एका व्यावसायिकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याचा आरोप करीत पोलिसांच्या या दडपशाहीची आ. गोवर्धन शर्मा आणि आ. रणधीर सावकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या दोन्ही आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पोलिसांचा हिंदूंच्या धार्मिक सण-उत्सवामध्ये अतिरेक वाढतच असल्याचीही माहिती यावेळी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिली. हिंदूंच्या सणांच्या बाबतीत न्यायालयाच्या नावावर अकोला पोलिसांनी प्रचंड दडपशाही सुरू केली आहे. शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले असून हा प्रकार तत्काळ रोखण्यात यावा, अशी मागणीही शर्मा आणि सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोमवारी केली. राजराजेश्‍वराचा पालखी कावड यात्रा महोत्सव शांततेत सुरू असताना आणि कोणतेही कारण नसताना बाजारपेठेतील दुकाने बंद करण्यास पोलीस प्रशासनाने भाग पाडले. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी केलेल्या अतिरेकी कारवाईमुळे शिवाजी पार्क येथील व्यावसायिक प्रकाश अंबादास येळमे (६१) यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाल्याचेही आ. गोवर्धन शर्मा व आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस प्रशासनाकडून हा प्रकार सुरू असून सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न अकोला पोलीस करीत असल्याचा आरोपही या दोन आमदारांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या तक्रारीत केला आहे. येणार्‍या काळात गणपती तसेच नवरात्रामध्येसुद्धा असा प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन सरकारविरुद्ध अशा प्रकारचे कृत्य करून जनभावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असून यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करण्याची गरज असल्याचेही या दोन आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे स्पष्ट केले.न्यायालयात निर्दोष सुटलेले तडीपार शहरातील काही युवकांना तडीपार करण्यात आले आहे. ज्या युवकांनी दीड ते दोन वर्ष कारागृहात काढल्यानंतर ते निर्दोष सुटले अशा युवकांना वेठीस धरण्यासाठी त्यांना तब्बल दोन वर्षांंसाठी जिल्हय़ातून तडीपार करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाने न्यायालयाच्या नावाखाली हिंदू धर्मीयांना वेठीस धरण्याचा सपाटाच लावला असून यावर तातडीने अंकुश मिळविण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावे, असेही आ. शर्मा व सावरकर यांनी निवेदनात स्पष्ट केले.