शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

तक्रार करताय, आधी नियमांची पूर्तता करा!

By admin | Updated: January 3, 2015 01:27 IST

अकोला मनपाचा निर्णय; नागरिकांचा आखडता हात

आशिष गावंडे / अकोलाप्रभागातील अवैध बांधकाम असो वा नाल्या-सर्व्हिस लाइन, बंद पथदिवे किंवा रस्ते साफसफाईची समस्या, ती दूर करण्यासाठी नागरिक मनपाकडे तक्रारी करतात. यापुढे मात्र अशा तक्रारी करताना संबंधिताना दहावेळा विचार करावा लागेल. आधी नियमांची पूर्तता करा, त्यानंतरच तक्रारींची दखल घेतल्या जाईल,अशा स्वरूपाची नियमावलीच मनपाने जारी केली आहे. नियमावली पाहून अकोलेकरांनी आखडता हात घेतल्याची परिस्थिती आहे.अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा, पथदिव्यांची सुविधा, नाल्या-सर्व्हिस लाइनची दैनंदिन साफसफाई, रस्त्यांची झाडपूस, पायी चालण्यासाठी फुटपाथ व प्रशस्त रस्ते आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टीसह मनपाच्या इतर नियमांची पूर्तता करून कर जमा करण्याची नैतिक जबाबदारी अकोलेकरांचीसुद्धा आहे. शहरात १ लाख ३0 हजारपेक्षा जास्त मालमत्ताधारकांची मनपाकडे नोंद आहे. यामधील अवघे ३५ ते ४0 हजार मालमत्ताधारक मनपाचे दायित्व अदा करतात. परिणामी प्रशासनाला पुरेसे उत्पन्न प्राप्त होत नसल्याने मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते. साहजिकच शहरात समस्या निर्माण होतात. नागरिकांना भेडसावणार्‍या तक्रारींचे निरसन करण्यात नगरसेवक अपयशी ठरल्यानंतर मनपाकडे धाव घेतल्या जाते. यातही अवैध बांधकामाच्या तक्रारी क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. यावर तोडगा न निघाल्यास तक्रारींचा महापूर साचतो. यावर उपाय म्हणून मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी तक्रारींचे निरसन करण्यापूर्वी नागरिकांनी मनपाच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी एक नियमावलीच जारी केली. यामध्ये अर्जदाराचे नाव, तक्रारीचे स्वरूप, चालू वर्षाचा मालमत्ता कर-पाणीपट्टी जमा केल्याचा गोषवारा, तसेच घर बांधकामाची परवानगी व परवानगीचा क्रमांक, दिनांक नमूद करण्याचा समावेश आहे. नळ कनेक्शन असल्यास परवानगी क्रमांक, दिनांक व अवैध असल्यास वैधतेकरिता प्रयत्न केले काय, इमारतीमध्ये अग्निशमनची व्यवस्था केली काय आदी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले. तक्रार स्वीकारण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली. मनपाने जारी केलेली नियमावली लक्षात घेता, संबंधित व्यक्तीने नियमांची पूर्तता केली असेल तरच तक्रारीला प्राधान्य दिले जाईल, असे दिसून येते. या नियमावलीमुळे मागील काही दिवसांत मनपाकडे तक्रारींचा खच कमी झाल्याची माहिती आहे.