शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार करताय, आधी नियमांची पूर्तता करा!

By admin | Updated: January 3, 2015 01:27 IST

अकोला मनपाचा निर्णय; नागरिकांचा आखडता हात

आशिष गावंडे / अकोलाप्रभागातील अवैध बांधकाम असो वा नाल्या-सर्व्हिस लाइन, बंद पथदिवे किंवा रस्ते साफसफाईची समस्या, ती दूर करण्यासाठी नागरिक मनपाकडे तक्रारी करतात. यापुढे मात्र अशा तक्रारी करताना संबंधिताना दहावेळा विचार करावा लागेल. आधी नियमांची पूर्तता करा, त्यानंतरच तक्रारींची दखल घेतल्या जाईल,अशा स्वरूपाची नियमावलीच मनपाने जारी केली आहे. नियमावली पाहून अकोलेकरांनी आखडता हात घेतल्याची परिस्थिती आहे.अकोलेकरांना नियमित पाणीपुरवठा, पथदिव्यांची सुविधा, नाल्या-सर्व्हिस लाइनची दैनंदिन साफसफाई, रस्त्यांची झाडपूस, पायी चालण्यासाठी फुटपाथ व प्रशस्त रस्ते आदी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. नियमित मालमत्ता कर, पाणीपट्टीसह मनपाच्या इतर नियमांची पूर्तता करून कर जमा करण्याची नैतिक जबाबदारी अकोलेकरांचीसुद्धा आहे. शहरात १ लाख ३0 हजारपेक्षा जास्त मालमत्ताधारकांची मनपाकडे नोंद आहे. यामधील अवघे ३५ ते ४0 हजार मालमत्ताधारक मनपाचे दायित्व अदा करतात. परिणामी प्रशासनाला पुरेसे उत्पन्न प्राप्त होत नसल्याने मूलभूत सोयी-सुविधा पुरविताना प्रशासनाची दमछाक होते. साहजिकच शहरात समस्या निर्माण होतात. नागरिकांना भेडसावणार्‍या तक्रारींचे निरसन करण्यात नगरसेवक अपयशी ठरल्यानंतर मनपाकडे धाव घेतल्या जाते. यातही अवैध बांधकामाच्या तक्रारी क्लिष्ट स्वरूपाच्या असतात. यावर तोडगा न निघाल्यास तक्रारींचा महापूर साचतो. यावर उपाय म्हणून मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी तक्रारींचे निरसन करण्यापूर्वी नागरिकांनी मनपाच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी एक नियमावलीच जारी केली. यामध्ये अर्जदाराचे नाव, तक्रारीचे स्वरूप, चालू वर्षाचा मालमत्ता कर-पाणीपट्टी जमा केल्याचा गोषवारा, तसेच घर बांधकामाची परवानगी व परवानगीचा क्रमांक, दिनांक नमूद करण्याचा समावेश आहे. नळ कनेक्शन असल्यास परवानगी क्रमांक, दिनांक व अवैध असल्यास वैधतेकरिता प्रयत्न केले काय, इमारतीमध्ये अग्निशमनची व्यवस्था केली काय आदी माहिती देणे बंधनकारक करण्यात आले. तक्रार स्वीकारण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली. मनपाने जारी केलेली नियमावली लक्षात घेता, संबंधित व्यक्तीने नियमांची पूर्तता केली असेल तरच तक्रारीला प्राधान्य दिले जाईल, असे दिसून येते. या नियमावलीमुळे मागील काही दिवसांत मनपाकडे तक्रारींचा खच कमी झाल्याची माहिती आहे.