शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

 श्वानदंशावरील लसीलाही जीएसटीचा ब्रेक; शासकीय दरात पुरवठा करण्यास कंपनीचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:14 IST

अकोला: आरोग्य विभागात श्वानदंशावरील (अँटी रेबीज व्हॅक्सीन) लस अत्यावश्यक औषधांच्या यादीत असताना गेल्या जुलै २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सातत्याने मागणी करूनही हैद्राबाद येथील उत्पादक कंपनीने लसीचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्दे हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ या कंपनीला जुलै २०१७ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला. ५ लाखांचा धनादेशही दिला; मात्र त्याच काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. महिना उलटला तरी कंपनीने अद्याप पुरवठा केला नाही.

अकोला: आरोग्य विभागात श्वानदंशावरील (अँटी रेबीज व्हॅक्सीन) लस अत्यावश्यक औषधांच्या यादीत असताना गेल्या जुलै २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सातत्याने मागणी करूनही हैद्राबाद येथील उत्पादक कंपनीने लसीचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. जीएसटीमुळे शासकीय दरापेक्षा लसीच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपये वाढ झाल्याने कंपनीने साठा नसल्याचे कारण देत जिल्हा परिषदेच्या पुरवठा आदेशाला ब्रेक लावला आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून गरजेच्या ४० टक्केच पुरवठा केला, हे विशेष.ग्रामीण भागातील रुग्णांना जवळच्या ठिकाणी श्वानदंशावर लस उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेने आर्थिक तरतूद केली. त्यातून आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये या लसीचा पुरवठा व्हावा, यासाठी हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ या कंपनीला जुलै २०१७ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला. त्यासाठी ५ लाखांचा धनादेशही दिला; मात्र त्याच काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. त्यामुळे कंपनीने लसीचा पुरवठाच केला नाही. त्यानंतर १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुन्हा ५ लाखांच्या धनादेशासह पुरवठा आदेश दिला. महिना उलटला तरी कंपनीने अद्याप पुरवठा केला नाही. याबाबत कंपनीशी संपर्क केला असता ‘नो स्टॉक’ असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात पुरवठा न करण्यास शासनाने ठरवून दिलेला दरच अडसर असल्याची माहिती आहे. त्या दरात कंपनी कोणत्याही परिस्थितीत पुरवठा करणार नाही. ही वस्तुस्थिती असली तरी कंपनीच्या दराने जिल्हा परिषदेला खरेदी करता येत नाही, या कचाट्यात जिल्ह्यातील श्वानदंश रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात आहे.

जीएसटीसह किमतीत ५० रुपयांची वाढशासनाने श्वानदंशावरील लसीची किंमत १२७ रुपये ठरवून दिली आहे. या किमतीतच देशभरातील आरोग्य यंत्रणांना भारत बायोटेक कंपनीकडून आधी पुरवठा केला जायचा. जुलैमध्ये जीएसटी लागू होताच या लसीचे दर १७० रुपयांपर्यंत गेल्याचे सांगण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने लसीची खरेदी जिल्हा परिषद किंवा आरोग्य यंत्रणेला करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांनी शासकीय दराने दिलेले पुरवठा आदेश कंपनीने बाजूला ठेवत स्टॉक नसल्याचे कारण पुढे केले.

गरज १०,८००; पुरवठा ४,०००लसीच्या शासकीय दरामुळे आरोग्य यंत्रणांना कंपनीकडून ती मिळणे कठीण झाले. त्यामुळे शासन स्तरावरूनच खरेदी करत जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणांना पुरवठा केला जात आहे. ते प्रमाणही अत्यल्प आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षभरात १०,८०० लस उपलब्ध ठेवल्या जातात. या गरजेच्या तुलनेत शासनाने आधी ३२००, त्यानंतर ८०० लसींचा पुरवठा केला. हे प्रमाण पाहता वर्षभरात केवळ ४० टक्केच पुरवठा झाला आहे. परिणामी, गेल्या वर्षभरापासून श्वानदंश रुग्णांची परवड होत असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदGSTजीएसटी