शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

 श्वानदंशावरील लसीलाही जीएसटीचा ब्रेक; शासकीय दरात पुरवठा करण्यास कंपनीचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 15:14 IST

अकोला: आरोग्य विभागात श्वानदंशावरील (अँटी रेबीज व्हॅक्सीन) लस अत्यावश्यक औषधांच्या यादीत असताना गेल्या जुलै २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सातत्याने मागणी करूनही हैद्राबाद येथील उत्पादक कंपनीने लसीचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्दे हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ या कंपनीला जुलै २०१७ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला. ५ लाखांचा धनादेशही दिला; मात्र त्याच काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. महिना उलटला तरी कंपनीने अद्याप पुरवठा केला नाही.

अकोला: आरोग्य विभागात श्वानदंशावरील (अँटी रेबीज व्हॅक्सीन) लस अत्यावश्यक औषधांच्या यादीत असताना गेल्या जुलै २०१७ पासून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सातत्याने मागणी करूनही हैद्राबाद येथील उत्पादक कंपनीने लसीचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे. जीएसटीमुळे शासकीय दरापेक्षा लसीच्या किमतीमध्ये तब्बल ५० रुपये वाढ झाल्याने कंपनीने साठा नसल्याचे कारण देत जिल्हा परिषदेच्या पुरवठा आदेशाला ब्रेक लावला आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून गरजेच्या ४० टक्केच पुरवठा केला, हे विशेष.ग्रामीण भागातील रुग्णांना जवळच्या ठिकाणी श्वानदंशावर लस उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेने आर्थिक तरतूद केली. त्यातून आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये या लसीचा पुरवठा व्हावा, यासाठी हैद्राबाद येथील ‘भारत बायोटेक’ या कंपनीला जुलै २०१७ मध्ये पुरवठा आदेश देण्यात आला. त्यासाठी ५ लाखांचा धनादेशही दिला; मात्र त्याच काळात वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाला. त्यामुळे कंपनीने लसीचा पुरवठाच केला नाही. त्यानंतर १७ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पुन्हा ५ लाखांच्या धनादेशासह पुरवठा आदेश दिला. महिना उलटला तरी कंपनीने अद्याप पुरवठा केला नाही. याबाबत कंपनीशी संपर्क केला असता ‘नो स्टॉक’ असे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात पुरवठा न करण्यास शासनाने ठरवून दिलेला दरच अडसर असल्याची माहिती आहे. त्या दरात कंपनी कोणत्याही परिस्थितीत पुरवठा करणार नाही. ही वस्तुस्थिती असली तरी कंपनीच्या दराने जिल्हा परिषदेला खरेदी करता येत नाही, या कचाट्यात जिल्ह्यातील श्वानदंश रुग्णांना वाऱ्यावर सोडले जात आहे.

जीएसटीसह किमतीत ५० रुपयांची वाढशासनाने श्वानदंशावरील लसीची किंमत १२७ रुपये ठरवून दिली आहे. या किमतीतच देशभरातील आरोग्य यंत्रणांना भारत बायोटेक कंपनीकडून आधी पुरवठा केला जायचा. जुलैमध्ये जीएसटी लागू होताच या लसीचे दर १७० रुपयांपर्यंत गेल्याचे सांगण्यात येते. शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने लसीची खरेदी जिल्हा परिषद किंवा आरोग्य यंत्रणेला करता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांनी शासकीय दराने दिलेले पुरवठा आदेश कंपनीने बाजूला ठेवत स्टॉक नसल्याचे कारण पुढे केले.

गरज १०,८००; पुरवठा ४,०००लसीच्या शासकीय दरामुळे आरोग्य यंत्रणांना कंपनीकडून ती मिळणे कठीण झाले. त्यामुळे शासन स्तरावरूनच खरेदी करत जिल्हा परिषद व आरोग्य यंत्रणांना पुरवठा केला जात आहे. ते प्रमाणही अत्यल्प आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षभरात १०,८०० लस उपलब्ध ठेवल्या जातात. या गरजेच्या तुलनेत शासनाने आधी ३२००, त्यानंतर ८०० लसींचा पुरवठा केला. हे प्रमाण पाहता वर्षभरात केवळ ४० टक्केच पुरवठा झाला आहे. परिणामी, गेल्या वर्षभरापासून श्वानदंश रुग्णांची परवड होत असल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदGSTजीएसटी