शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शाळांच्या शुल्कवाढीवर नियंत्रणासाठी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 17:13 IST

समिती गठित करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे रोजगार गेले, पुढील काही काळ ही परिस्थिती सामान्य होणे शक्य नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापनांनी गेल्यावर्षीचे शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करू नये, तसेच चालू वर्षाच्या सत्रात शुल्कवाढ करू नये, असे निर्देश दिले. तरीही शाळा व्यवस्थापनांनी मनमानी सुरूच ठेवल्यास पालकांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हास्तरावर समिती गठित केली आहे. तालुका स्तरावरही समिती गठित करण्याचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या काळात संस्था, शाळा, विद्यार्थी-पालकांना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करीत आहेत. त्याबाबतच्या तक्रारी शासनाकडे करण्यात आल्या. त्यामुळे यासंदर्भात ३० मार्च रोजीच्या पत्रानुसारच सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना विद्यार्थी-पालकांकडून शाळेची चालू वर्षाची व आगामी वर्षाचे शुल्क जमा करण्याची सक्ती न करण्याचे निर्देश दिले. त्यामध्ये पालकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० व २०२०-२१ या वर्षातील देय,शिल्लक फिस वार्षिक किंवा एकदाच न घेता मासिक-त्रैमासिक जमा करण्याचा पर्याय द्यावा, येत्या सत्रात कोणतीही शुल्क वाढ करू नये, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी काही शैक्षणिक सुविधांचा वापर करावा लागला नाही, व त्याचा खर्च कमी होत असल्यास पालकांच्या कार्यकारी समितीमध्ये ठराव करून त्याप्रमाणे शुल्क कमी करावे, लॉकडाऊन काळात गैरसोय टाळण्यसाठी पालकांना आॅनलाइन शुल्क भरण्याचा पर्याय द्यावा, असेही निर्देश देण्यात आले. शासनाच्या या निर्देशानुसार शाळांमध्ये अंमलबजावणी न झाल्यास पालकांनी शिक्षण विभागाने गठित केलेल्या समितीकडे मेलद्वारेतक्रार करावी, त्यावर समितीकडून निर्णय घेऊन तक्रारकर्त्याला मेलवरच कळविले जाणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र