शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

दिलासादायक....दिल्लीच्या कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावच्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:50 IST

उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला.

ठळक मुद्देवाडेगाव येथून ३१ मार्च रोजी १८ जणांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता.उर्वरीत ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला.

अकोला : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतलेल्या वाडेगावातील उर्वरीत ९ जणांचेही वैद्यकीय चाचणी अहवाल शनिवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला. मात्र, वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १५ संधिग्ध रुग्णांनी आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. या सर्वांच्या वैद्यकीय अहवालाकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागून आहे.बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथून ३१ मार्च रोजी १८ जणांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला होता. परंतु, उर्वरीत ९ जणांच्या अहवालाकडे लक्ष लागून असतानाच वाशिम जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ संधिग्ध रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शनिवारी त्यात आणखी दोघांची भर पडल्याने पातुर येथील संधिग्ध रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. शिवाय, तेल्हारा तालुक्यातीलही दोघांना संधिग्ध रुग्ण म्हणून आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. संधिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना वाडेगावातील उर्वरीत ९ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे.१८ जणांचे ‘स्वॅब’ पाठविले नागपूरलाआयसोलेशन कक्षात दाखल कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांपैकी १८ जणांचे ‘स्वॅब’ शनिवारी सकाळीच तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे. यामध्ये पातूर येथील १३ संधिग्ध रुग्णांचे ‘स्वॅब’ असून, त्यांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.तांत्रिक अडचणीमुळे होत आहे दिरंगाईनागपूर येथील ‘व्हीआरडीएल’लॅबवर विदर्भातील अकराही जिल्ह्यांचा भार आहे. राज्यभरात कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना, लॅबमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संधिग्ध रुग्णांचे वैद्यकीय चाचणी अहवाल मिळण्यास अडचणी जात आहेत.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

वाशिमनंतर अमरावती जिल्ह्यातही कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते. अशातच अकोल्यातही कोरोनाचा रुग्ण आढळल्याची चर्चा रंगली होती. मात्र, ही केवळ अफवा असून, जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, घरातच सुरक्षीत राहा, असे आवाहन देखील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस