शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST

पर्यावरण जतन-संवर्धनाची प्रतिज्ञा अकोला : पर्यावरण जतन संवर्धनाबाबत जनजागृती व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे ...

पर्यावरण जतन-संवर्धनाची प्रतिज्ञा

अकोला : पर्यावरण जतन संवर्धनाबाबत जनजागृती व प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे ‘माझी वसुंधरा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा भाग म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व सर्व शासकीय विभागाचे अधिकारी यांनी पर्यावरण जतन संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही प्रतिज्ञा सर्व उपस्थितांना दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित हाेते.

जिल्हाधिकारी कार्यालयात ई-टपाल प्रणालीचा प्रारंभ

अकोला : नववर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ई-टपाल प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते रिमोट्द्वारे क्लिक करून ही प्रणाली सुरू करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, नपा प्रशासन अधिकारी सुप्रिया तोलारे तसेच सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

यावेळी या प्रणालीबाबत जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संदीप चिंचोले यांनी सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, या प्रणालीद्वारे जमा होणाऱ्या टपालाची पोहोच पावतीही अर्जदारास व पत्र देणारास मिळणार आहे. या पत्राला संबंधित विभागप्रमुख हे संबंधित कार्यासनापर्यंत पोहोचवून त्याचे ऑनलाइन ट्रॅकिंगही करू शकणार आहेत. लवकरच प्रत्येक विभागनिहाय या प्रणालीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन ही प्रणाली सर्व कार्यालयांत लागू केली जाईल,असे त्यांनी सांगितले.