शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

कृषी दिनी मुख्यमंत्री साधणार टिटवा येथील शेतकऱ्याशी संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST

बबन इंगळे बार्शिटाकळी: येणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करीत, शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहेत. नवनवीन प्रयोग ...

बबन इंगळे

बार्शिटाकळी: येणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करीत, शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहेत. नवनवीन प्रयोग करून, फळबाग, वनस्पती, मसाला पिके, कडधान्य आदींसह अनेक पिकांच्या भरघोस उत्पादन घेऊन नफा मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच पद्धतीने शेती पिकवून सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा येथील शेतकरी मोहनराव देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन, दि. १ जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत.

बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या टीमने देशमुख यांना घरचे सोयाबीन बियाणे साठवून ठेवण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केल्याने, त्यांनी सोयाबीन बियाणे पेरणीयोग्य असे साठवून ठेवले. आज रोजी ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणे शेतात पेरणी केले, ते सर्व उगवल्याची माहिती शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे देशमुख यांना दिली. याची दखल घेऊन कृषी विभागामार्फत देशमुख यांची माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली. त्यानुसार, कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री या शेतकऱ्यांसोबत थेट ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

------------------------------------------------

५०० क्विंटल सोयाबीनची केली विक्री!

शेतकरी मोहनराव देशमुख यांच्याकडे शंभर एकर शेती आहे. यंदा खरीप हंगामापूर्वी विविध कंपन्यांच्या पॅकिंगच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरच्याच बियाण्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. उगवण शक्ती तपासल्यानंतर ८० टक्केच्या जवळपास बियाणे पेरणीयोग्य असल्याने त्यांनी अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५०० क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे बाजार भावापेक्षा अधिक नफा मिळवून विक्री केले. यामधून त्यांना तब्बल ३० लाख रुपयांचा नफा झाला. त्याची दखल घेऊन कृषी आयुक्तालयाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी देशमुख यांचा सत्कार केला.

---------------------------------------------

टिटवा येथील शेतकरी देशमुख यांनी घरचे सोयाबीन बियाणे विक्री केल्याने विक्रमी नफा मिळविला. त्यांच्याशी कृषी दिनी थेट मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

-कांताप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, अकोला.

--------------------------------------------

मी खरीप हंगामातील पेरणीसाठी पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनात घरचेच दर्जेदार पेरणीयोग्य सोयाबीन बियाणे घरूनच बाजारभावापेक्षा अधिक दराने विकले. यातून मला ३० लाख रुपयांचा नफा मिळाला असून, शेतकऱ्यांनाही लाभ झाला.

- मोहनराव देशमुख, शेतकरी, टिटवा.