शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कृषी दिनी मुख्यमंत्री साधणार टिटवा येथील शेतकऱ्याशी संवाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST

बबन इंगळे बार्शिटाकळी: येणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करीत, शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहेत. नवनवीन प्रयोग ...

बबन इंगळे

बार्शिटाकळी: येणाऱ्या नैसर्गिक संकटावर मात करीत, शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करीत आहेत. नवनवीन प्रयोग करून, फळबाग, वनस्पती, मसाला पिके, कडधान्य आदींसह अनेक पिकांच्या भरघोस उत्पादन घेऊन नफा मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. अशाच पद्धतीने शेती पिकवून सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न घेणाऱ्या बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा येथील शेतकरी मोहनराव देशमुख यांच्या कार्याची दखल घेऊन, दि. १ जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थेट या शेतकऱ्याशी संवाद साधणार आहेत.

बार्शीटाकळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या टीमने देशमुख यांना घरचे सोयाबीन बियाणे साठवून ठेवण्याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केल्याने, त्यांनी सोयाबीन बियाणे पेरणीयोग्य असे साठवून ठेवले. आज रोजी ज्या शेतकऱ्यांनी हे बियाणे शेतात पेरणी केले, ते सर्व उगवल्याची माहिती शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे देशमुख यांना दिली. याची दखल घेऊन कृषी विभागामार्फत देशमुख यांची माहिती वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आली. त्यानुसार, कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री या शेतकऱ्यांसोबत थेट ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

------------------------------------------------

५०० क्विंटल सोयाबीनची केली विक्री!

शेतकरी मोहनराव देशमुख यांच्याकडे शंभर एकर शेती आहे. यंदा खरीप हंगामापूर्वी विविध कंपन्यांच्या पॅकिंगच्या सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता, कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरच्याच बियाण्याचे प्रात्यक्षिक करून पाहिले. उगवण शक्ती तपासल्यानंतर ८० टक्केच्या जवळपास बियाणे पेरणीयोग्य असल्याने त्यांनी अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५०० क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे बाजार भावापेक्षा अधिक नफा मिळवून विक्री केले. यामधून त्यांना तब्बल ३० लाख रुपयांचा नफा झाला. त्याची दखल घेऊन कृषी आयुक्तालयाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक यांनी देशमुख यांचा सत्कार केला.

---------------------------------------------

टिटवा येथील शेतकरी देशमुख यांनी घरचे सोयाबीन बियाणे विक्री केल्याने विक्रमी नफा मिळविला. त्यांच्याशी कृषी दिनी थेट मुख्यमंत्री ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

-कांताप्पा खोत, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, अकोला.

--------------------------------------------

मी खरीप हंगामातील पेरणीसाठी पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनात घरचेच दर्जेदार पेरणीयोग्य सोयाबीन बियाणे घरूनच बाजारभावापेक्षा अधिक दराने विकले. यातून मला ३० लाख रुपयांचा नफा मिळाला असून, शेतकऱ्यांनाही लाभ झाला.

- मोहनराव देशमुख, शेतकरी, टिटवा.