शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
3
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
4
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
5
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
6
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
9
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
10
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
11
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
12
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
13
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
14
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
15
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
16
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
17
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
18
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
19
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
20
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...

हमीभावाने मोडले कापूस उत्पादकांचे कंबरडे

By admin | Updated: February 5, 2015 01:42 IST

दरवाढीच्या प्रतीक्षेत थकलेल्या शेतक-यांनी शेवटी कापूस काढला विकायला.

राजरत्न सिरसाट / अकोला: केंद्रीय कृषी विभागाने हमीभाव जाहीर करताना कापूस उत्पादक शेतकर्‍यांना निराशेच्या गर्तेत टाकले असूून, या हंगामात बाजारातही कापसाचे सरासरी दर हमीदरापेक्षा कमी म्हणजे ३६00 ते ३९00 रुपये प्रतिक्विंटल असल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रंचड आर्थिक कोंडीत सापडला आहे. दर वाढतील, या अपेक्षेत असलेल्या शेतकर्‍यांनी अखेर कापूस विक्रीला काढला आहे. पण, खासगी बाजारातही लूट होत असल्याने अग्रिम बोनस द्यावे किंवा सामाजिक सुरक्षितता म्हणून शासनाने कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने या खरीप हंगामामील लांब धाग्याच्या कापसाला ४0५0 रुपये प्रतिक्विंटल आधारभूत किंमत जाहीर केली आहे. असे असले तरी प्रतवारीचे निकष लावून शेतकर्‍यांकडून कापसाची खरेदी केली जात असल्याने हमीदर ४0५0 असले तरी प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या पदरी प्रतिक्विंटल ३६00 ते ३९00 रुपये येत आहेत. या दरात शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे विदर्भातील कापसाचे क्षेत्र घटत असून, आजमितीस हे क्षेत्र १८ लाखांहून घटून १0 लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. यावर्षी अल्प पावसाचा कापूस पिकावर परिणाम झाल्याने उत्पादन घटले आहे. दुसरीकडे उत्पादन खर्चावर आधारित दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला येथील एका शासकीय सभेत कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रिम बोनस देण्यावर विचार चालू असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकर्‍यांचा अपेक्षा वाढल्या होत्या. पण, अग्रिम बोनसचा विचार झाला नसल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला आहे. अखेर दरवाढीच्या प्रतीक्षेत घरी ठेवलेला कापूस शेतकर्‍यांनी विक्रीला काढला असून, राज्यात आजमितीस जवळपास १३0 लाख क्विंटल कापसाची खरेदी भारतीय कापूस महामंडळ, कापूस उत्पादक पणन महासंघ आणि खासगी व्यापार्‍यांनी केली आहे.