शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

हवामान बदलाचा परिणाम शेती, अर्थकारणावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:19 IST

कमी दिवसांत अधिक पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होताना दिसत आहे. तापमानातही बदल होत आहे. यावर्षीचा पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. याचा परिणाम पिके व उत्पादनावर झाला आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: हवामान बदलाचा परिणाम शेती, शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होताना दिसत असून, बदलत्या हवामानाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविसाठी स्वतंत्र संशोधन कें द्र, आचार्य (पीएचडी)पदवी अभ्याक्रम सुरू करावा, यासाठीचे प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुरू केले आहेत; परंतु शासनाकडून दखल घेण्यात आली नाही. यावर्षी पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.पावसाचे चित्र बदलले आहे. कमी दिवसांत अधिक पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होताना दिसत आहे. तापमानातही बदल होत आहे. यावर्षीचा पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. याचा परिणाम पिके व उत्पादनावर झाला आहे. भौगोलिकदृष्ट्या राज्यात नऊ कृषी हवामान विभाग असून, डोंगराळ, सपाट, खोलगट प्रदेश आहेत. प्रत्येक विभागातील पीक रचना भिन्न आहे. यानुसार शेतकºयांना कृषीविषयक माहिती देताना कृषी शास्त्रज्ञांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.ही स्थिती दरवर्षी निर्माण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी कृषी हवामान केंद्र, बळकटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. शेतीला स्थैर्य द्यायचे असेल, तर कृषी हवामानाचा अंदाज घेऊन सूक्ष्म पातळीवर शेतकºयांना सल्ला देता आला पाहिजे, हा यामागे उद्देश आहे. याकरिता तालुका स्तरावर माणसे लागणार आहेत. म्हणूनच शिक्षित मनुष्यबळाची गरज भासणार आहे. या सर्व बाबींचा अंतर्भाव कृषी विद्यापीठाने पुन्हा नवीन प्रस्तावात केला आहे.कृषी हवामानावर ‘पीएचडी’ नाही!महाराष्ट्र प्रगत राज्य असताना, या विषयावर महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत पुणे येथील केंद्र वगळता राज्यात दुसरीकडे पीएचडी करता येत नाही. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करायचे असेल, तर कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र केंद्र व पीएचडीचा अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे.

हवामान बदलाचे आव्हान बघता कृषी हवामान संशोधन, शिक्षण अभ्यास केंद्र मिळावे, यासाठी आग्रही आहोत. स्वतंत्र हवामान विभागाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. आता नवीन माहितीसह प्रस्ताव तयार केला आहे.- डॉ. व्ही. एम. भाले, कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ