शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वातावरण बदलाचा हरभरा पिकाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:03 IST

Climate change News पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

ठळक मुद्देहरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे.यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे.

अकोला : वातावरणात अचानक झालेल्या बदलासाेबतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विदर्भात हरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन फवारणी करण्याचाही सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणानंतर काही दिवस हवामान कोरडे होते. मागील दोन दिवसांत अचानक वातावरणात बदल होऊन अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तज्ज्ञांच्या मते पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भात बसणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांंगितले. यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे. आगामी एक ते दीड महिना तूर शेतात राहत असेल, तर एक वेळ फवारणी करणे आवश्यक आहे, मात्र तूर हार्वेस्टिंगवर असेल तर फवारणीची गरज नसल्याचेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

फेब्रुवारीपर्यंत अवकाळीची शक्यता

प्रशांत महासागरात २ ते ३ अंशाने तापमान घटल्याने हवेतील दाब वाढत आहे. तेथील बाष्प दक्षिण आशियाकडे लोटले जाते. ऑगस्ट २०२० पासूनच प्रशांत महासागरातील तापमान कमी होत असल्याने दक्षिण आशियात अवकाळी पावसाचे सावट आहे. अवकाळी पावसाचे हे संकट फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

 

अवकाळी पावसापेक्षा वातावरणातील बदलाचा पिकांवर जास्त परिणाम होणार आहे. विदर्भात घाटे अळीचे संकट वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. फरदडीचा कापूस शेतकऱ्यांनी घेऊ नये.

- डॉ. डी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी