शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

वातावरण बदलाचा हरभरा पिकाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:03 IST

Climate change News पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

ठळक मुद्देहरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे.यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे.

अकोला : वातावरणात अचानक झालेल्या बदलासाेबतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विदर्भात हरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन फवारणी करण्याचाही सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणानंतर काही दिवस हवामान कोरडे होते. मागील दोन दिवसांत अचानक वातावरणात बदल होऊन अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तज्ज्ञांच्या मते पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भात बसणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांंगितले. यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे. आगामी एक ते दीड महिना तूर शेतात राहत असेल, तर एक वेळ फवारणी करणे आवश्यक आहे, मात्र तूर हार्वेस्टिंगवर असेल तर फवारणीची गरज नसल्याचेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

फेब्रुवारीपर्यंत अवकाळीची शक्यता

प्रशांत महासागरात २ ते ३ अंशाने तापमान घटल्याने हवेतील दाब वाढत आहे. तेथील बाष्प दक्षिण आशियाकडे लोटले जाते. ऑगस्ट २०२० पासूनच प्रशांत महासागरातील तापमान कमी होत असल्याने दक्षिण आशियात अवकाळी पावसाचे सावट आहे. अवकाळी पावसाचे हे संकट फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

 

अवकाळी पावसापेक्षा वातावरणातील बदलाचा पिकांवर जास्त परिणाम होणार आहे. विदर्भात घाटे अळीचे संकट वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. फरदडीचा कापूस शेतकऱ्यांनी घेऊ नये.

- डॉ. डी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी