शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
2
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
3
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
4
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
5
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
6
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
7
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
8
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
9
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
10
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
11
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
12
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
13
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
14
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
15
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
16
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
17
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
18
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
19
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
20
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा हरभरा पिकाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 11:03 IST

Climate change News पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

ठळक मुद्देहरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे.यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे.

अकोला : वातावरणात अचानक झालेल्या बदलासाेबतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने विदर्भात हरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे. त्यामुळे हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन फवारणी करण्याचाही सल्ला कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी दिला आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणानंतर काही दिवस हवामान कोरडे होते. मागील दोन दिवसांत अचानक वातावरणात बदल होऊन अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तज्ज्ञांच्या मते पावसाचा पिकांवर थेट परिणाम होत नसला, तरी बदललेल्या वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा सर्वाधिक फटका पश्चिम विदर्भात बसणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांंगितले. यासोबतच तुरीवरही संकट कायम आहे. आगामी एक ते दीड महिना तूर शेतात राहत असेल, तर एक वेळ फवारणी करणे आवश्यक आहे, मात्र तूर हार्वेस्टिंगवर असेल तर फवारणीची गरज नसल्याचेही कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

फेब्रुवारीपर्यंत अवकाळीची शक्यता

प्रशांत महासागरात २ ते ३ अंशाने तापमान घटल्याने हवेतील दाब वाढत आहे. तेथील बाष्प दक्षिण आशियाकडे लोटले जाते. ऑगस्ट २०२० पासूनच प्रशांत महासागरातील तापमान कमी होत असल्याने दक्षिण आशियात अवकाळी पावसाचे सावट आहे. अवकाळी पावसाचे हे संकट फेब्रुवारीपर्यंत राहणार असल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी सांगितले.

 

अवकाळी पावसापेक्षा वातावरणातील बदलाचा पिकांवर जास्त परिणाम होणार आहे. विदर्भात घाटे अळीचे संकट वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. फरदडीचा कापूस शेतकऱ्यांनी घेऊ नये.

- डॉ. डी. उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी