शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापसाच्या चुकाऱ्याचा मार्ग मोकळा; लवकरच ‘पणन’ला मिळणार एक हजार कोटींचे कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 10:42 IST

लवकरच एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच ४०० कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना केले जाणार आहेत.

अकोला: महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक महासंघाला लवकरच एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच ४०० कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना केले जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात ५४ कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत; परंतु पणन महासंघाकडील पैसा संपला असून, मनुष्यबळाची कमतरता असल्याने कापूस मोजणी व साठवणूक करणे पणन महासंघाला जड झाले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात ताळेबंदी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती. तथापि, २० एप्रिलनंतर शेतमाल विक्री-खरेदी करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर पणन महासंघाने राज्यात पुन्हा ५४ च्या वर कापूस खरेदी केंदे्र सुरू केली असून, ३० हजार क्विंटलच्या जवळपास कापूस खरेदी केला आहे. असे असले तरी पणन महासंघाची आर्थिक स्थिती बिकट आहे. पणन महासंघाने २,३०० कोटी रुपये कर्ज घेतले असून, २,९०० कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना अदा करायचे होते. त्यातील २,३०० कोटी रुपयांवर चुकारे अदा करण्यात आले आहेत. उर्वरित चुकारे लवकरच अदा करण्यात येणार आहेत. आता पणन महासंघाकडील पैसे संपले आहेत. त्यासाठी पणन महासंघाने एक हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठीचे पाऊल उचलले आहे. हे कर्ज मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शासनाकडून मार्जिन मनी म्हणून देण्यात येणारे ९६ कोटी रुपये थकले आहेत. तेदेखील मिळणे आवश्यक आहे. पणनला कर्ज घेण्यासाठी शासनाला बँक गॅरंटी घ्यावी लागते, त्यासंदर्भात कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे एक हजार कोटी रुपये पणन महासंघाला मिळतील. हे पैसेदेखील पुरणार नसल्याचे पणन महासंघाचे म्हणणे आहे. या सर्व पृष्ठभूमीवर पणन महासंघाने राज्यात ५४ च्या वर कापूस खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. पणन महासंघ व्यापारी आणि शेतकरी यामधील दुवा म्हणून शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी संस्था म्हणून पणन महासंघाकडे बघितले जाते; परंतु आजमितीस ही संस्था बिकट स्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. या संस्थेला पुढे सुरू ठेवायचे असेल, तर शासनाने राज्य स्तरावर नोडल एजन्सी म्हणून स्वतंत्र कापूस खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी पणन महासंघाची मागणी आहे. सद्यस्थितीत या संस्थेला पैशाची नितांत गरज असल्याने शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

 पणन महासंघाला आर्थिक चणचण भासत आहे. असे असले तरी शेतकऱ्यांची ही संस्था असून, लवकरच कापसाचे चुकारे केले जाणार आहेत. बँकेकडून कर्ज प्राप्त प्राप्त होण्यासाठीची प्रकिया पूर्ण झाली आहे. एक हजार कोटी रुपयांचे कर्ज लवकरच मिळणार आहे.--अनंतराव देशमुख,अध्यक्ष, पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस