शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

सर्व प्रकारचा कचरा साफ करा!

By admin | Updated: September 12, 2016 02:27 IST

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा मेळाव्यात खा. धोत्रे यांचे आवाहन.

अकोला, दि. ११: चारित्र्य गेले की सारे संपले. सिद्धांत आणि चारित्र्यावर पक्ष उभा राहिला आहे, याची जाण ठेवा. थोडे काम करा पण चांगले करा. भौतिक विकासासोबत तळागाळातील माणसांचीदेखील प्रगती होईल, असे कौशल्य शिका. बदमाश अधिक श्रीमंत होत आहे आणि शंभर एकर शेती असून, शेतकरी गरीब राहत आहे. चांगल्या माणसाच्या हाती कारभार आला पाहिजे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा धागा पकडून खा. संजय धोत्रे यांनी सर्व प्रकारचा कचरा साफ करण्याचे आवाहन केले. रविवारी स्थानिक खंडेलवाल भवनात झालेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. दिग्विजय दिन म्हणून हा मेळावा पार पडला. अकोला जिल्हय़ातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी येथे बहुसंख्येने उपस्थित होते.मंचावर खा. संजय धोत्रेसह महापौर उज्‍जवलाताई देशमुख, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, आकाश फुंडकर यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी अँड. गिरीश गोखले, प्रताप अरसड, संजय शर्मा, अक्षय लहाने, संजय मिरगे, अनुप गोसावी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांची येथे समयोचित भाषणे झाली. आगामी महापालिका, जि. प. निवडणुकांमध्ये काँग्रेसचा सफाया करण्याचा संकल्प पदाधिकार्‍यांनी करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. आमदार शर्मा यांनी भाजयुमोचे कौतुक करीत २0 वर्षे मोदींची सत्ता कायम राहील फक्त आईसोबत बेइमानी करू नका, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सागळे आणि अंबरीश कविश्‍वर यांनी केले, तर आभार अनुप गोसावी यांनी मानले.