शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियान; ‘क्यूसीआय’च्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 15:12 IST

शौचालयांची कामे रखडली असल्याने राज्यात ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडिया)ने केलेल्या तपासणी व चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.

अकोला: स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या धर्तीवर राज्यात पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. सार्वजनिक शौचालयांची संकल्पना मोडीस काढून त्याऐवजी वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्याचा त्यामध्ये समावेश होता. २०१७ मध्ये राज्य शासनाने शहरांना हगणदरीमुक्त घोषित केले असले तरी अद्यापही महापालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक शौचालये कायम आहेत. दुसरीकडे नवीन वैयक्तिक शौचालयांची कामे रखडली असल्याने राज्यात ‘क्यूसीआय’ (क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडिया)ने केलेल्या तपासणी व चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’अभियानच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवल्या जात आहे. अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करणे व दुसऱ्या टप्प्यात घनकचºयाचे विलगीकरण करण्याचा समावेश आहे. वैयक्तिक शौचालयांसाठी महापालिकांना केंद्र शासन व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले. सद्यस्थितीत अकोला शहरात १७ हजार वैयक्तिक शौचालये बांधण्यात आली. हगणदरीमुक्त केलेल्या भागाची केंद्र शासनाच्या चमूने पाहणी केल्यानंतर २०१७ मध्ये राष्ट्रपतींच्या उपस्थितीत राज्यातील अनेक शहरांना हगणदरीमुक्त घोषित करण्यात आले. यामध्ये अकोला मनपाचा समावेश होता. त्यावेळी ज्या महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या निधीचा वापर केला अशा स्वायत्त संस्थांसाठी शासनाने आॅक्टोबर २०१८ मध्ये २०७ कोटी ८३ लाख रुपये अनुदान वितरित केले. दरम्यान, सार्वजनिक शौचालयांची संकल्पना मोडीत काढून वैयक्तिक शौचालयासाठी जागा उपलब्ध नसणाºया अशा सहा कुटुंबांसाठी एक याप्रमाणे शौचालय बांधून देणे अपेक्षित होते. २६ महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालये कायम असून, अभियान अंतर्गत प्राप्त निधीतून त्यांच्या देखभाल दुरुस्तीवर खर्च केला जात आहे. केंद्र शासनाच्या ‘क्यूसीआय’च्या चमूने या सर्व बाबींची नोंद घेणे क्रमप्राप्त असताना तसे होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.लाभार्थींना शौचालयांची प्रतीक्षाशासनाने वितरित केलेल्या २०७ कोटींच्या निधीतून अकोला मनपाला ८ कोटी ८६ लाख रुपये मिळाले आहेत. हा निधी यापूर्वी बांधकाम केलेल्या शौचालयांवर खर्च झाला. दुसरीकडे मागील दीड वर्षांपासून नवीन वैयक्तिक शौचालयांची कामे ठप्प पडली आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान