शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

शहर हगणदरीमुक्त; अडीच कोटींच्या अनुदानाला शासनाचा ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 1:14 PM

हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्त असल्याचे आढळून आले होते.हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. हगणदरीमुक्त घोषित केलेल्या अकोला महापालिकेला अद्यापही अडीच कोटींचे अनुदान मिळाले नाही, हे विशेष.

- आशिष गावंडे

 अकोला:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाने जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्त असल्याचे आढळून आले होते. त्यानुषंगाने केंद्रीय समितीने राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहराला हगणदरीमुक्त घोषित केले होते. हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. कचऱ्याच्या विलगीकरणासाठी सतत निरनिराळे प्रयोग राबविण्याचे महापालिकांना निर्देश देणाºया शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. २०१६ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासनाने शहरी भागात पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना शौचालये बांधून दिली. यामध्ये सार्वजनिक शौचालयांसह १८ हजार ६७० शौचालयांचा समावेश होता. मनपाने अकोलेकरांमध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास बसल्यास रोगराई पसरत असल्याची जाणीव करून दिली. त्यापूर्वी राज्य शासनाच्या चमूने शहराचे सर्वेक्षण केल्यानंतर शहराला हगणदरीमुक्त घोषित केले होते. मनपाच्या दाव्याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रतिनिधींनी शहरात दाखल होत सार्वजनिक शौचालयांसह काही ठरावीक भागाची पाहणी केली होती. पाहणीचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केल्यानंतर केंद्रीय समितीने शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले होते.अडीच कोटींचे अनुदान मिळालेच नाही!‘स्वच्छ भारत’ अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचा समावेश होता. दुसºया टप्प्यात कचºयाचे ओला आणि सुका असे विलगीकरण करून, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा समावेश आहे. यासाठी राज्य शासनाकडून महापालिकांना वेळोवेळी दिशानिर्देश दिले जात असून, वेळप्रसंगी महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशाराही दिला जात आहे. दुसरीकडे हगणदरीमुक्त घोषित केलेल्या अकोला महापालिकेला अद्यापही अडीच कोटींचे अनुदान मिळाले नाही, हे विशेष.

राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरवकेंद्रीय समितीने राज्यात हगणदरीमुक्त घोषित केलेल्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांचा मुंबईत राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुणगौरव केला होता. हगणदरीमुक्त झालेल्या महापालिकांना निकषानुसार केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपये तसेच नगरपालिकांसाठी एक कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.

शहर स्वच्छतेच्या मुद्यावर तपासणी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात केंद्राची चमू अकोल्यात दाखल होत आहे. त्यावेळी रखडलेल्या अनुदानाचा विषय उपस्थित केला जाईल. त्या पृष्ठभूमीवर रविवारी आढावा घेण्यात आला.-जितेंद्र वाघ आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका