शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

शहर हगणदरीमुक्त; अडीच कोटींच्या अनुदानाला शासनाचा ‘खो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 13:17 IST

हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.

ठळक मुद्दे जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्त असल्याचे आढळून आले होते.हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. हगणदरीमुक्त घोषित केलेल्या अकोला महापालिकेला अद्यापही अडीच कोटींचे अनुदान मिळाले नाही, हे विशेष.

- आशिष गावंडे

 अकोला:  स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाने जानेवारी २०१८ मध्ये केलेल्या तपासणीत अकोला शहर हगणदरीमुक्त असल्याचे आढळून आले होते. त्यानुषंगाने केंद्रीय समितीने राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शहराला हगणदरीमुक्त घोषित केले होते. हगणदरीमुक्त घोषित झालेल्या शहरांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त होणार होते. कचऱ्याच्या विलगीकरणासाठी सतत निरनिराळे प्रयोग राबविण्याचे महापालिकांना निर्देश देणाºया शासनाला मागील सहा महिन्यांपासून अडीच कोटींच्या अनुदानाचा विसर पडलाच कसा, असा सवाल उपस्थित होत आहे.‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रात ज्या नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय बांधून देण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मनपा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. २०१६ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत प्रशासनाने शहरी भागात पात्र लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना शौचालये बांधून दिली. यामध्ये सार्वजनिक शौचालयांसह १८ हजार ६७० शौचालयांचा समावेश होता. मनपाने अकोलेकरांमध्ये जनजागृती करीत उघड्यावर शौचास बसल्यास रोगराई पसरत असल्याची जाणीव करून दिली. त्यापूर्वी राज्य शासनाच्या चमूने शहराचे सर्वेक्षण केल्यानंतर शहराला हगणदरीमुक्त घोषित केले होते. मनपाच्या दाव्याची पुन्हा पडताळणी करण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी केंद्र शासनाच्या क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रतिनिधींनी शहरात दाखल होत सार्वजनिक शौचालयांसह काही ठरावीक भागाची पाहणी केली होती. पाहणीचा अहवाल केंद्रीय समितीकडे सादर केल्यानंतर केंद्रीय समितीने शहर हगणदरीमुक्त झाल्याचे घोषित केले होते.अडीच कोटींचे अनुदान मिळालेच नाही!‘स्वच्छ भारत’ अभियानच्या पहिल्या टप्प्यात शहरांना हगणदरीमुक्त करण्याचा समावेश होता. दुसºया टप्प्यात कचºयाचे ओला आणि सुका असे विलगीकरण करून, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा समावेश आहे. यासाठी राज्य शासनाकडून महापालिकांना वेळोवेळी दिशानिर्देश दिले जात असून, वेळप्रसंगी महापालिकांचे अनुदान बंद करण्याचा इशाराही दिला जात आहे. दुसरीकडे हगणदरीमुक्त घोषित केलेल्या अकोला महापालिकेला अद्यापही अडीच कोटींचे अनुदान मिळाले नाही, हे विशेष.

राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरवकेंद्रीय समितीने राज्यात हगणदरीमुक्त घोषित केलेल्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषदांचा मुंबईत राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुणगौरव केला होता. हगणदरीमुक्त झालेल्या महापालिकांना निकषानुसार केंद्र व राज्य शासनाकडून अडीच कोटी रुपये तसेच नगरपालिकांसाठी एक कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.

शहर स्वच्छतेच्या मुद्यावर तपासणी करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात केंद्राची चमू अकोल्यात दाखल होत आहे. त्यावेळी रखडलेल्या अनुदानाचा विषय उपस्थित केला जाईल. त्या पृष्ठभूमीवर रविवारी आढावा घेण्यात आला.-जितेंद्र वाघ आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका