शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

अकोल्यात वातावरण बदलावर मंथन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 4:11 PM

सध्या भेडसावत असलेल्या वातावरणावर, शेतीवर विपरीत परिणाम होत असून, या अनुषंगाने शास्त्रज्ञांचे मंथन सुरू आहे.

अकोला : वातावरण अनुरू प दिशादर्शक तंत्रज्ञान विकासावर दोन दिवसीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या परिषदेला देशातील शास्त्रज्ञ उपस्थित झाले आहेत. सध्या भेडसावत असलेल्या वातावरणावर, शेतीवर विपरीत परिणाम होत असून, या अनुषंगाने शास्त्रज्ञांचे मंथन सुरू आहे. शेतीचे आरोग्य तपासणे गरजेचे असून, मूलभूत गुणधर्मावर संशोधन आवश्यक असल्याचा सूर परिषदेत उमटला.शेतीचा पोत बदलत असून, मातीतील आवश्यक घटक अनेक भागात कमी झाल्याचे निदर्शनात येत आहे. गंधक, जस्त व इतर पूरक घटक पूर्ण असल्यास पिकांचे उत्पादन वाढते. आता वातावरणात प्रचंड बदल होत असतानाचे चित्र आहे. या अनुषंगाने वातावरण अनुरू प दिशादर्शक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले होते. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ.एस.के. चौधरी,डॉ.पी. चंद्रन, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तपस भट्टाचार्य, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए.एस. धवन, डॉ.व्ही.के. खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. चौधरी यांनी पीक उत्पादनासाठी माती हा महत्त्वाचा घटक असून, जमिनीच्या मूलभूत गुणधर्मावर संशोधन करणे अत्यंत आवशक असल्याचे नमूद केले. डॉ. चंदन यांनी मृद परीक्षण, सर्वेक्षण व तपासणी करू न जमीन व्यवस्थान करणे काळाची गरज असल्याचे मत मांडले. जमिनीचे आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर प्रथम जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी भूगर्भाचा अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे डॉ. भट्टाचार्य यांनी सांगितले. डॉ. धवन यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे असून, सेंद्रिय शेती व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाने त्यांनी केलेले संशोधन हे सरळ व सोप्या भाषेत वृत्तपत्राद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.परिषदेला डॉ.पी.जी. इंगाले, डॉ.पी.आर. कडू,डॉ. नितीन कोंडे, डॉ.एस.डी. जाधव आदीसह राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या ३५० शास्त्रज्ञांची उपस्थिती होती. 

 

टॅग्स :Akolaअकोला