शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

कचरा वेचणा-याच्या आयुष्यात मुलांच्या रूपाने अरुणोदय!

By admin | Updated: October 12, 2015 01:49 IST

कचरा वेचणा-याची मुले झाली उच्चशिक्षित.

नितीन गव्हाळे / अकोला: कुडा कचरा वेचता-वेचता आयुष्याचाच कचरा झाला. कचरा हेच आपलं जीवन. लोकांच्या दारोदार जाऊन कुडाकचरा गोळा करून संसाराचं रहाटगाडं ओढतो आहे; परंतु ही परिस्थिती आपल्या मुलांवर ओढवू नये, त्यांचं जीवनही आपल्यासारखंच कचर्‍यात जाऊ नये. त्यासाठी त्यांना शिकविलं पाहिजे, या विचाराने एक बा प झपाटतो आणि दिवसाला १२-१४ तास काम करून मेहनतीनं आपल्या तीनही मुलांना शिकवितो. त्यांना उच्चशिक्षित बनवितो. मुलांनीही बापाच्या संघर्षाची, परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण घेतलं आणि कचरा वेचणार्‍या बापाच्या आयुष्यात अरुणोदयाची पहाट आणली. कचरा वेचून मुलांना प्रज्ञावंत बनवणारा हा बाप आहे, अरुण यशवंत बागडे. अरुणभाऊ व त्यांची पत्नी माया हे दोघेही अल्पशिक्षित. त्यांचे वडील सावतराम मिलमध्ये कामाला होते. घरची परिस्थिती गरिबीची. दोन मुले, एक मुलगी असा संसार. दररोज पहाटे उठून कचरा गाडी घ्यायची आणि मोरेश्‍वर कॉलनी, वृंदावननगर, खेडकरनगर, राऊतवाडी परिसरातील दारोदार फिरायचं. घरातील कुडाकचरा गोळा करायचा. कचरा गाडीत टाकायचा. यातून कसातरी उदरनिर्वाह भागायचा. पंधरा वर्षांंपासून नित्यनेमाने अरुणभाऊ हे काम करीत आहे त. आपल्या नशिबी कचर्‍यात जगण्याचं आयुष्य आलं; परंतु आपल्या मुलांच्या नशिबी हे येऊ नये, यासाठी अरुणभाऊंनी मुला-मुलीला चांगल्या शाळेत टाकलं. त्यांना शिकविलं. मुलंही हुशार निघाली. त्यांची बुद्धिमत्ता ओळखून अरुणभाऊंनी त्यांना काहीही कमी पडू दिलं नाही. दाढी वाढलेला त्यांचा चेहरा, बनियानला पडलेली भोकं. त्यांच्या नशिबाची कथा कथन करतात. मुलांनीही बापाच्या मेहनतीची, त्यांच्या संघर्षाची जाणीव ठेवत स्वत:ला झोकून दिलं आणि त्या बापाचे नाव सार्थ ठरवित, खर्‍याअर्थाने अरुणोदयाची पहाट उजाडली. मोठी मुलगी कोमल ही एमए प्रथम वर्षाला शिकते आहे. दुसरा मुलगा अमर हा औरंगाबादला बीई सिव्हिलच्या द्वितीय वर्षाला शिकतो आणि धाकटा देवाशिष इयत्ता १२ वीत आहे. तो कुस्ती व ज्युदोपटू आहे. उद्या ही मुले शिकून इंजिनिअर, अधिकारी होतील. कचरा, वेचता-वेचता कचर्‍यातूनच अरुणभाऊंनी ज्ञानरूपी फुले.. उगवली. म्हणूनच ही खचलेल्या, गरिबीच्या गर्तेत दिवस काढणार्‍यांसाठी प्रेरणावाट आहे. *मोरेश्‍वर फाऊंडेशनने बनवून दिला स्वच्छता रथअरुणभाऊ दारोदार फिरून कचरा गोळा करतात. त्यांची कचरा गाडी ठिकठिकाणी मोडकळीस आली होती. त्यातून कचरा सांडायचा. ही परिस्थिती मोरेश्‍वर फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत पागृत यांनी पाहिली. त्यांनी परिसरातील नागरिकांना ही बाब सांगितली. श्रीकांतभाऊसह डॉ. केशव मेहरे, नामदेव पागृत, छोटू ढेगळे, मनोहर देशमुख, सुरेश सागळे, गोपाल घुले, बाबाराव गोरे, गणेश उमाळे, डॉ. इंगळे, हरिदास लकडे, विश्‍वनाथ गांजरे, शेषराव काळे, रवींद्र लिखार, संदीप वाघडकर, शेखर ठाकरे, विशाल युतकार, छोटू देशमुख, डिक्कर, डॉ. राजेंद्र ढवळे, प्रशांत ठाकरे, पिंटू वानेडकर, प्रभंजन निमकर्डे, अभिजित कौसल, सचिन काळे, विजय लोहित, पंकज साकला, गोकुळ भड, राजेश शिंदे, शेखर भड, अभिमन्यू ढेंगळे, राजेश देशपांडे, किशोर सपकाळ, समाधान शिंदे, भरत ढेंगळे, प्रणय देशमुख, श्रीकांत पाटील, किशोर काळे, राजेश भड, मनीष वाघुळदे, उल्हास पद्मवार, अनिल इचे आदींनी वर्गणी करून अरुणभाऊंना कचरागाडीची दुरुस्ती व डागडुजी करून नवीन कचरागाडी बनवून दिली.