शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मूल होत नाही, पती व सासरकडून विवाहितेचा छळ; विवाहितेची तक्रार, पतीसह ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By नितिन गव्हाळे | Updated: August 30, 2023 20:39 IST

लग्नाला पाच वर्ष झाली तरी, मूलबाळ होत नाही. यावरून पतीसह सासरचे लोक टोमणे मारायचे.

अकोला : लग्नाला पाच वर्ष झाली तरी, मूलबाळ होत नाही. यावरून पतीसह सासरचे लोक टोमणे मारायचे. तसेच दवाखाना करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून छळ करायचे. या प्रकरणात विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पातुरातील एका २५ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार मेहकर तालुक्यातील पार्डी येथील नितेश महादेव राठोड याच्यासोबत २०१८ मध्ये विवाह झाला. लग्नामध्ये वडिलांनी अडीच लाख रूपये खर्च केला. सहा महिने सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. 

त्यानंतर क्षुल्लक कारणावरून सासरकडील लोक त्रास देऊ लागले. घराचे बांधकाम करण्यासाठी पैसे आणण्याचा तगादा लावत होते. त्यानंतरही कसेबसे दिवस काढले. लग्नाला पाच वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने, सासरकडील लोक टोमणे मारून पतीला भडकवून देत होते. त्यामुळे पती मारहाण करायचे. तसेच दवाखाना करण्यासाठी व बांधकामासाठी माहेराहून १ लाख रूपये आणण्याचा तगादा लावून मानसिक छळ करायचे.

पती नितेश महादेव राठोड, सासरे महादेव केशव राठोड, सासू देवका राठोड, जेठ मनोज राठोड, जेठानी अर्चना राठोड, नणंद सोनू तुफान आडे, नणंद कालदा आडे, नंदोई तुफान संग्राम आडे हे क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करायचे. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करायचे, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी