शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

अकोल्यातील  मोर्णा स्वच्छता मोहिमेचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

By atul.jaiswal | Updated: February 20, 2018 19:08 IST

अकोला:  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.

ठळक मुद्देअकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्णा स्वच्छता मोहिम. या मोहिमेमुळे जलकुंभी व कचऱ्याने भरलेली ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ झाली आहे.मोर्णा स्वच्छता मोहिमेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे अकोलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अकोला:  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली लोकचळवळ बनलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.  परिवर्तन, जिदद, चिकाटी, कायापालट या शब्दांचा अर्थ काय आहे, हे समस्त अकोलेकरांनी मोर्णा नदी स्वच्छता अभियानातून दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशाच्या इतिहासात स्वच्छ मोर्णा मोहिमेचा समावेश ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. या अभियानाबददल आपण समस्त अकोलेकरांचे व प्रशासनाचे मन:पूर्वक अभिनंदन करतो, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मोर्णा स्वच्छता मोहिमेचे कौतुक केले.  या कौतुकाबददल जिल्हाधिकाऱ्यांनी मा. मुख्यमंत्री यांचे आभार मानले आहेत.  

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 13 जानेवारी 2018 पासून लोकसहभागातून सुरु झालेल्या या मोहिमेमुळे जलकुंभी व कचऱ्याने भरलेली ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ झाली आहे. मोर्णा स्वच्छता मोहिमेची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळे अकोलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काय म्हणाले  मुख्यमंत्री ?

मुख्यमंत्री आपल्या मनोगतात म्हणाले की, परिवर्तन, जिदद, चिकाटी, कायापालट या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, हे समस्त अकोलेकरांनी मोर्णा नदी स्वच्छता अभियानातून दाखवून दिले आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात देशाच्या इतिहासात स्वच्छ मोर्णा मोहिमेचा समावेश ही  संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. एखादी मोहिम लोकचळवळ म्हणून स्वीकारली जाते, तेव्हा काय चमत्कार होतो, हे ही या निमित्ताने पुन्हा एकदा आपण अनुभवतो आहोत, या अभियानाबददल मी समस्त अकोलेकरांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. प्रशासनानेसुध्दा हे अभियान यशस्वी करण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. प्रशासन आणि नागरिकांच्या हातात हात घालून काम करण्याच्या या प्रयत्नांना मा. पंतप्रधानांनी देखील गौरविले आहे. मला विश्वास आहे की, हे अभियान लवकरच पूर्णत्वाला जाईल आणि आपण स्वत: पूनर्जिवीत केलेली नदी म्हणून अकोल्यातील जनतेचे स्वप्न लवकरच पूर्णत्वास येईल. या मोहिमेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला माझा सलाम…! या निमित्ताने एक आवाहन करावेसे मला वाटते, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयाने असे एक अभियान हातात घ्यावे, राज्यातील हे 36 अभिनव प्रयोग संपूर्ण देशाला दिशादर्शन करतील. जलयुक्त शिवार सारखे लोकसहभागाचे मॉडेल आज अनेक राज्य स्वीकारत आहेत. आज विविध क्षेत्रात, विविध आघाडयांवर आपले राज्य प्रगती करीत आहे. अनेक क्षेत्रात आपण अग्रणी आहोत. जल, जमीन आणि जंगल यांच्या संरक्षणात, संवर्धनात आपण पुढाकार घेऊ आणि पर्यावरण रक्षणाचा जगापुढे आदर्श ठेवू. अकोल्यातील स्वच्छ मोर्णा अभियान निश्चित या प्रयत्नातील पहिला टप्पा म्हणून इतिहासात कोरला जाईल, यात माझ्या मनात शंका नाही, या अभियानासाठी झटणाऱ्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा…!

 

 

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस