शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

प्रमाणपत्र दिले, पण कर्जमाफीचा छदामही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:30 IST

अकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाण पत्र देण्यात आले; मात्र प्रमाणपत्र दिल्यानंतर सात दिवसांचा  कालावधी उलटून जात असला तरी, कर्जमाफीचे प्रमाणपत्र  दिलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात मंगळवारपर्यंत छदामही  जमा करण्यात आला नाही.

ठळक मुद्दे५६ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार  केव्हा?पातूर तालुक्यात पाच शेतकर्‍यांकडून परत घेतले कर्जमाफीचे  प्रमाणपत्र!

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या  जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ५६ शेतकर्‍यांना कर्जमाफीचे प्रमाण पत्र देण्यात आले; मात्र प्रमाणपत्र दिल्यानंतर सात दिवसांचा  कालावधी उलटून जात असला तरी, कर्जमाफीचे प्रमाणपत्र  दिलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात मंगळवारपर्यंत छदामही  जमा करण्यात आला नाही. त्यामुळे  शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात  कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार आणि शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड लाख रु पयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची नियमित पर तफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत प्रोत्साहनपर  अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना  विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ा तील थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज  शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्याचे काम  २२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. ऑनलाइन भरलेल्या  अर्जांंच्या पडताळणीत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या  थकबाकीदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र  ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात ५६ शेतकर्‍यांना  १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा  नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र  देण्यात आले. सात दिवसांचा कालावधी उलटून गेला; परंतु अद्यापही  कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जखा त्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली नाही. कर्जखा त्यात छदामही जमा झाला नसल्याने, प्रमाणपत्र दिलेल्या शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम केव्हा जमा होणार  आणि संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा  मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  

पातूर तालुक्यात पाच शेतकर्‍यांकडून परत घेतले कर्जमाफीचे  प्रमाणपत्र!कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांपैकी ५६  शेतकर्‍यांना १८ ऑक्टोबर रोजी कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात  आले. त्यापैकी पातूर तालुक्यात पाच शेतकर्‍यांकडून  कर्जमाफीचे प्रमाणपत्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  संबंधित गटसचिवांकडून परत घेण्यात आले. त्यामध्ये भंडारज  येथील प्रमोद रामभाऊ गव्हाळे, आस्टूलचे पंजाबराव इंगळे,  भानोसचे कसमदास राठोड, अंबाशी व माळराजुरा येथील प्र त्येकी एका शेतकर्‍याकडून कर्जमाफीचे प्रमाणपत्र परत घेण्यात  आले.

 १ लाख ९१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ दूरच!सात दिवसांपूर्वी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शेतकर्‍यांना  कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ अद्याप मिळाला नाही. त्यानुषंगाने  कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील उर्वरित १ लाख ९१ हजार १३१ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा  प्रत्यक्ष लाभ मिळणे दूरच असल्याचे वास्तव आहे.

कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या जिल्हय़ातील ५६ शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा करून, जमा  केलेल्या कर्जाच्या रकमेची मागणी संबंधित बँकांनी शासनाकडे  करावयाची आहे. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या ५६ शे तकर्‍यांच्या कर्जखात्यात कर्जाची रक्कम जमा केल्याचा  अहवाल अद्याप बँकांकडून प्राप्त झाला नाही.- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी