शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केंद्र शासनाने शिक्षक, शिक्षण तज्ज्ञांकडून मागविल्या सूचना, हरकती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 12:27 IST

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून देशभरातील शिक्षक, शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत.

अकोला: केंद्र शासनाकडून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा मसुदासुद्धा केंद्र शासनाने तयार केला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून देशभरातील शिक्षक, शिक्षण तज्ज्ञांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यासाठी मसुदा संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे.१९८६ मध्ये शिक्षणासंबंधी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले होते आणि १९९२ मध्ये शैक्षणिक धोरणात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर शैक्षणिक धोरणात अनेक बदल करण्यात आले. काही वर्षांपासून शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्याविषयी चर्चा सुरू होती. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध करण्याचा मानस व्यक्त केला जात होता. बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये बदल करून गतिशीलता आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांना कौशल्यासह ज्ञान उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल करण्याचा विचार करीत आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपलब्ध करून शैक्षणिक आणि उद्योगातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्याचा उद्देश यामागे आहे. त्यासाठी केंद्र शासनाने ‘एनसीईआरटी’च्या संकेतस्थळावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केला आहे. या मसुद्याच्या आधारे शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण तज्ज्ञ, पालकांकडून ३१ जुलैपर्यंत सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र