शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

केंद्रीय प्रवेश पद्धतीला महाविद्यालयांचाच विरोध!

By admin | Updated: May 22, 2017 01:04 IST

अकरावी: शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रिया समिती निवडण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावीची आॅनलाइन केंद्रीय पद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे; परंतु अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विज्ञान महाविद्यालयांचाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाची अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यशस्वी होते की नाही, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेसाठीच प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेतून कला व वाणिज्य शाखांना वगळण्यात आले असून, फक्त कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांमध्येच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल; परंतु याला विज्ञान महाविद्यालयांनीच विरोध दर्शविला आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातील विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील आणि शहरातील विज्ञान महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतील, अशी भीती विज्ञान महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे. तसेच शहरातील अनेक शिकवणी वर्ग संचालकांचे कनिष्ठ महाविद्यालये असल्याने, त्यांनीसुद्धा केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध दर्शविला आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे आमच्याच शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होणार असल्याने, शिकवणी वर्ग संचालकांची या केंद्रीय प्रवेश पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर आमच्या महाविद्यालयांमध्ये आम्ही केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवू देणार नाही, अशी भूमिका काही शिकवणी वर्ग संचालकांनी घेतली आहे. शिक्षण विभाग केंद्रीय पद्धतीची प्रवेश प्रक्रिया शहरातील ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविणार आहे; परंतु त्याला महाविद्यालयांनी विरोध दर्शविला आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध कशासाठी?शिक्षण विभागाने प्रथमच शहरात अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशपत्रिका विक्रीला ब्रेक लागणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या शिक्षण शुल्काचीसुद्धा शिक्षण विभागाला माहिती द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांनाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना पैसा मिळणार नाही. प्रवेशपत्रिका वितरणातून महाविद्यालयांची कमाई थांबणार असल्याने, महाविद्यालयांकडून केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध होत आहे. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून संमतिपत्र मागविण्यात आले आहेत. काही महाविद्यालयांनी संमतिपत्र दिले नाहीत. तरीसुद्धा सर्वच महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. -प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी