शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

केंद्रीय प्रवेश पद्धतीला महाविद्यालयांचाच विरोध!

By admin | Updated: May 22, 2017 01:04 IST

अकरावी: शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रिया समिती निवडण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता अकरावीची आॅनलाइन केंद्रीय पद्धतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे; परंतु अकरावी केंद्रीय प्रवेश पद्धतीला विज्ञान महाविद्यालयांचाच विरोध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाची अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यशस्वी होते की नाही, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. इयत्ता अकरावी विज्ञान शाखेसाठीच प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन केंद्रीय पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेतून कला व वाणिज्य शाखांना वगळण्यात आले असून, फक्त कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांमध्येच आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल; परंतु याला विज्ञान महाविद्यालयांनीच विरोध दर्शविला आहे. या प्रक्रियेमुळे शहरातील हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातील विज्ञान महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतील आणि शहरातील विज्ञान महाविद्यालयांमधील जागा रिक्त राहतील, अशी भीती विज्ञान महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे. तसेच शहरातील अनेक शिकवणी वर्ग संचालकांचे कनिष्ठ महाविद्यालये असल्याने, त्यांनीसुद्धा केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध दर्शविला आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीमुळे आमच्याच शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास अडचणी निर्माण होणार असल्याने, शिकवणी वर्ग संचालकांची या केंद्रीय प्रवेश पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर आमच्या महाविद्यालयांमध्ये आम्ही केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवू देणार नाही, अशी भूमिका काही शिकवणी वर्ग संचालकांनी घेतली आहे. शिक्षण विभाग केंद्रीय पद्धतीची प्रवेश प्रक्रिया शहरातील ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविणार आहे; परंतु त्याला महाविद्यालयांनी विरोध दर्शविला आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध कशासाठी?शिक्षण विभागाने प्रथमच शहरात अकरावी प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेशपत्रिका विक्रीला ब्रेक लागणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना आपल्या शिक्षण शुल्काचीसुद्धा शिक्षण विभागाला माहिती द्यावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांनाकडून कनिष्ठ महाविद्यालयांना पैसा मिळणार नाही. प्रवेशपत्रिका वितरणातून महाविद्यालयांची कमाई थांबणार असल्याने, महाविद्यालयांकडून केंद्रीय प्रवेश पद्धतीला विरोध होत आहे. केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांकडून संमतिपत्र मागविण्यात आले आहेत. काही महाविद्यालयांनी संमतिपत्र दिले नाहीत. तरीसुद्धा सर्वच महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. -प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी