शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी केंद्रच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 13:14 IST

अकोला: महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर त्यांच्या उत्पादनासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचा शासनाचा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून कागदावरच आहे.

- सदानंद सिरसाटअकोला: महिला बचत गटातील सदस्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुकास्तरावर त्यांच्या उत्पादनासाठी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याचा शासनाचा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून कागदावरच आहे. विक्री केंद्रांची निर्मिती न झाल्याने दरवर्षी राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये स्वस्ती प्रदर्शनावर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा सोपस्कार पार पाडला जात आहे.ग्रामविकास विभागाने १९९९ पासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्तींचे जीवनमान उंचावण्यासाठी देशातील प्रगत तंत्रज्ञान सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना रोजगार देणे, प्रतिमाह दोन हजार रुपयांपर्यंत त्यांचे उत्पादन व्हावे, यासाठी स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना राबवण्यात आली. त्यासाठी बचत गटांना कर्जही देण्यात आले. स्वरोजगारातून तयार झालेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रत्येक विभाग, जिल्हा पातळीवर विक्री प्रदर्शने आयोजित करणे, प्रत्येक जिल्हा, तालुका ठिकाणी कायमस्वरूपी विक्री केंद्र उभारण्याला मंत्रिमंडळाच्या १८ सप्टेंबर २००८ रोजीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी निधीची तरतूदही ठरवण्यात आली; मात्र त्यानंतर विक्री केंद्र उभारण्याचा उपक्रम पूर्णपणे कागदावरच राहिला. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात अशी विक्री केंद्र उभारण्यात आली, याची कोणतीच माहिती पुढे आलेली नाही. त्याचवेळी दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात १० लाख रुपये खर्च करून वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी निधी दिला जातो. विभागस्तरावर हा निधी ३५ लाख रुपये दिला जातो. दरवर्षी ४ कोटी ९० लाख रुपये त्यासाठी खर्च होतात. त्यातून बचत गटांच्या महिलांच्या हातात किती रोजगार पडते, ही बाब आता शोधाची झाली आहे. त्याचीही माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा स्तरावर आहे की नाही, याचाही धांडोळा घेण्याची वेळ आली आहे.- तीन वर्षाची मुदतही संपलीसंपूर्ण राज्यभरात कायमस्वरूपी विक्री केंद्र बांधण्यासाठी राज्यात तीन वर्षांची मुदतही ठरवून देण्यात आली होती. ती केव्हाच उलटली. केंद्र कुठे अस्तित्वात आली, याची माहिती आता शासनाकडूनच घ्यावी लागणार आहे. जिल्हा केंद्रासाठी ५० लाख तर तालुका केंद्रासाठी २५ लाख रुपये निधी देण्याची तयारीही शासनाने केली होती. जिल्ह्यातील बचत गटांना रोटेशन पद्धतीने पंधरा दिवसांसाठी केंद्रे उपलब्ध होती.- जिल्हा परिषदेच्या जागा पडूनजिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागावर केंद्र उभारण्याचे प्रस्ताव शासनाने मागवले होते. जिल्हा परिषदांच्या जागा पडून असल्यावरही तेथे केंद्रांची उभारणी झाली नाही, हे विशेष.

 

टॅग्स :Akolaअकोला