शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

दुर्गम, अतिदुर्गम भागात आदिवासींचे पाडे, वस्त्यांना जोडण्यासाठी केंद्राचा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 14:27 IST

अकोला: कें द्र शासनाने आदिवासी विकास विभागाला केवळ रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

ठळक मुद्दे१०० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या भागात उभारणार रस्ते. रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.आदिवासी नागरिक विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

- आशिष गावंडेअकोला: दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाºया आदिवासींना शाळा, आरोग्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांची हेळसांड होते. १०० पेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या भागात रस्त्यांची नितांत आवश्यकता असल्यामुळे कें द्र शासनाने आदिवासी विकास विभागाला केवळ रस्त्यांचे निर्माण करण्यासाठी १७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्राप्त निधीतून आदिवासी लोकसंख्येच्या वाड्या, पाडे, वस्त्यांपर्यंत रस्ते तयार के ले जाणार आहेत.राज्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाºया आदिवासींपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते उपलब्ध नाहीत. डोंगर-माथा, जंगलातून वाट काढत आदिम जमातीच्या वस्त्यांपर्यंत पोहोचताना प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ उडते. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते तयार नसल्यामुळे आदिम जमातीच्या वस्त्या, पाडे, वाड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधांची पूर्तता करणे शक्य होत नसल्याची परिस्थिती आहे. त्याठिकाणी शाळा, आरोग्य केंद्र तसेच कुपोषण टाळण्यासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रांचा अभाव राहत असल्यामुळे आजही आदिवासी नागरिक विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर असल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास विभागामार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता भासते. त्यामुळे आदिम जमातीच्या १०० पेक्षा अधिक लोकसंख्येच्या वाड्या, पाडे, वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते तयार करण्याकरिता २ डिसेंबर रोजी केंद्र शासनाने १७ कोटी ३५ लाख रुपये निधी मंजूर केला आहे.१०८ रस्त्यांसह पुलांचे कामराज्यात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, पालघरमधील विक्रमगड, डहाणू, जव्हार, तलासरी, रायगड जिल्ह्यातील खालापूर, कर्जत येथील आदिवासी भागात १०८ रस्त्यांसह विविध ठिकाणच्या पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीकडून प्राप्त झाले होते.