शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

  काजू, बदाम, कडधान्याला फुटले काेंब; अडीच काेटींच्या अन्नधान्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 10:36 IST

Akola Flood : पुराचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण हाेऊन ते दुकानांमध्ये शिरले. यामुळे ७० पेक्षा अधिक दुकानांमधील अन्नधान्याची नासाडी झाली.

- आशिष गावंडे

अकाेला : मिनी बायपासलगतच्या नवीन किराणा बाजारात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. बाजारातील पाण्याचा निचरा हाेणारा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेल्या नालीमुळे बंद झाला. पुराचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण हाेऊन ते दुकानांमध्ये शिरले. यामुळे ७० पेक्षा अधिक दुकानांमधील अन्नधान्याची नासाडी हाेऊन काजू, बादाम व कडधान्याला काेंब फुटले आहेत. सुमारे अडीच काेटींच्या धान्याची नासाडी झाली असताना इन्शुरन्स कंपन्यांकडून सर्व्हेसाठी टाळाटाळ केली जात आहे.

नवीन किराणा बाजारात पुराचे पाणी शिरल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने देताच रात्री १ वाजेपर्यंत अनेक व्यापाऱ्यांनी बाजाराकडे धाव घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बाजारात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे मुसळधार पावसातही पाणावलेल्या डाेळ्यांनी दुकानांमधील अन्नधान्याची नासाडी पाहण्याची दुर्दैवी वेळ व्यापाऱ्यांवर ओढवली. अकाेला मर्चंट असाेसिएशनने बांधलेल्या नाल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेल्या नालीमुळे बंद झाल्याचे पाहून व्यापाऱ्यांना धक्काच बसला. त्यामुळे पर्यायी नाल्यातील माती काढेपर्यंत दुकानांमधील काेट्यवधी रुपयांचे अन्नधान्य पाण्याने भिजले.

 

ड्रायफ्रूट, कडधान्यांना लागली बुरशी

किराणा बाजारातून ड्रायफ्रूट, कडधान्याची हाेलसेल विक्री हाेते. दुकानांत पाणी शिरल्याने लाखाे रुपयांचे ड्रायफ्रूट, कडधान्य व मसाल्याच्या पदार्थांची अक्षरश: वाट लागली. पूर ओसरल्यानंतर सहाव्या दिवशी काजू, बदाम, साेप व कडधान्यांस बुरशी लागल्याचे पहावयास मिळाले.

 

‘एनएचएआय’ने नाला केला बंद

मिनी बायपासच्या रुंदीकरणाच्या कामात सिमेंटचा नाला बांधण्यात आला. यामुळे बाजारातून निचरा हाेणारा नाला बंद झाला. हा नाला खुला करण्याची मागणी किराणा बाजारच्यावतीने ‘एनएचएआय’कडे एप्रिल महिन्यांत करण्यात आली हाेती, हे विशेष.

 

रात्री २ वाजता मनपाकडून जेसीबी

दुकानांमध्ये शिरलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद असल्याचे पाहून असाेसिएशनचे काेषाध्यक्ष चंचल भाटी यांनी रात्री १ वाजता जेसीबीसाठी पश्चिम झाेनचे क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे यांच्यासाेबत संपर्क साधला. रात्री २ वाजता टापरे जेसीबी घेऊन आल्यानंतर पुराच्या पाण्याची वाट माेकळी करण्यात आली.

 

...तर इन्शुरन्स कंपनीविराेधात गुन्हा

बाजारात काेट्यवधी रुपयांच्या अन्नधान्याची नासाडी झाली. महसूल विभागाने पंचनामा केला असला तरी अद्यापही इन्शुरन्स कंपनीकडून सर्व्हेसाठी टाळाटाळ केली जात असल्याची बाब व्यापाऱ्यांनी सांगितली. अशा कंपन्यांविराेधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

 

साखर, चहापत्ती पाण्यात

पुराच्या पाण्याने सखल भागातील घरे, दुकानांना वेढा घातला. डाबकी राेडवरील सरस्वती किराणा शाॅपीमधील साखर, चहापत्ती, शेंगदाणे, साबुदाना आदींसह इतर धान्य तळमजल्यात साठवले हाेते. तळमजल्यात सर्व्हिस लाइनमधून पाणी शिरले. आणि सकाळ उजाडेपर्यंत या सर्व अन्नधान्याची नासाडी झाल्याची माहिती श्रीहरी रामकृष्ण लावडे यांनी दिली.

 

‘एनएचएआय’ने बांधलेल्या नाल्यामुळे बाजारातील पाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पुराच्या पाण्याने दुकानातील गहू, तांदूळ, कडधान्य भिजले. २४५ कट्टे मालाची नासाडी हाेऊन माेठे आर्थिक नुकसान झाले.

-चंचल भाटी, काेषाध्यक्ष, अकाेला हाेलसेल मर्चंट असाेसिएशन

 

‘एनएचएआय’ने बाजाराच्या प्रवेशद्वारासमाेर माेठा नाला बांधताना बाजारातील नाल्याचा मार्ग बंद केला. हा मार्ग खुला ठेवला असता तर दुकानांमध्ये पाणी शिरले नसते. दुकानातील सुमारे १८ ते २० लाख रुपये किमतीचे कडधान्य भिजले. शासनाने किमान ५ लाखांची मदत करावी. याविषयी मर्चंट असाेसिएशन व विदर्भ चेंबरने पुढाकार घ्यावा.

-राजकुमार राजपाल, हाेलसेल व्यापारी

टॅग्स :Akolaअकोलाfloodपूर