शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

खासदार आदर्श गाव योजनेत केळीवेळीची निवड

By admin | Updated: November 8, 2014 00:11 IST

अकोला जिल्ह्यातील गाव, सोयी-सुविधांच्या सर्वेक्षणासाठी अधिका-यांची लवकरच बैठक.

अकोला : केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या खासदार आदर्श ग्राम योजनेत खासदार संजय धोत्रे यांनी आकोट तालुक्यातील केळीवेळी या गावाची निवड केली आहे. त्यानुसार केळीवेळी येथील मूलभूत सोयी-सुविधा आणि करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी लवकरच अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आदर्श ग्राम योजना सुरू केली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणार्‍या या योजनेत प्रत्येक खासदाराने १0 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या एका गावाची निवड करायची आहे. त्यानुषंगाने खासदार संजय धोत्रे यांनी ५ नोव्हेंबर रोजी खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गतल आकोट तालुक्यातील केळीवेळी या गावाची निवड केली. खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या या गावात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण व इतर सोयी-सुविधांच्या कामांचा समावेश आहे. ४७ गावांमधून केळीवेळीची वर्णी! खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील एका गावाची निवड खासदारांकडून केली जाणार असल्याने, त्यासाठी जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत ४७ गावांची यादी खासदार संजय धोत्रे यांच्याकडे सादर करण्यात आली होती. या ४७ गावांपैकी खासदार आदर्श ग्राम योजनेत केळीवेळी या गावाची वर्णी लागली आहे.