शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

बुलडाणा, मोताळा होणार वाय-फाय!

By admin | Updated: March 21, 2016 01:41 IST

गुढीपाडव्याला शुभारंभ; सपकाळ यांची अभिनव भेट.

बुलडाणा: एकविसाव्या शतकातील माहिती व दूरसंचार क्रांतीला सामोरे जाताना आजच्या तरुणाईमध्ये प्रचंड आकर्षण असलेल्या इंटरनेट सुविधेचा मोफत लाभ लवकरच बुलडाणा व मोताळा येथील नागरिकांना मिळणार आहे. तळहातावर येऊन ठेपलेला स्मार्ट फोन आज सामाजिक विकासात मोलाचे योगदान देऊ शकतो, या संकल्पनेतून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यावतीने ही मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.आज डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र व ई-माध्यमांच्या चर्चेचा फड सर्वत्र रंगतो; मात्र त्याची खरी ओळख प्रत्यक्ष लाभ मिळाल्यानंतरच कळू शकते. तसे तर मोफत वाय-फाय हे बुलडाणेकरांसाठी स्वप्नवतच! पण हे स्वप्न मराठी नूतन वर्षाच्या अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्षात उतरणार आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा व मोताळा या दोन्ही नगरांमध्ये महत्त्वपूर्ण ठिकाणी मोफत वाय-फाय हॉटस्पॉट उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड यांच्याशी सामंजस्य करार करण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाने सदर प्रस्तावास विशेष मान्यता प्रदान केली आहे. बुलडाणा, मोताळा या दोन नगरांबरोबरच बुलडाणा मतदारसंघातील ३९ ग्रामपंचायतींनासुद्धा ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर योजना ही तीन वर्षे कालावधीसाठी प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ६0 लाख रुपये खर्च अपेक्षीत आहे. यासंदर्भात बोलताना आ. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अर्मत्य सेन यांनी दारिद्रय़निर्मूलन व मानव विकास निर्देशांकाच्या वाढीसाठी सामान्य व्यक्ती हा जगाशी जोडला जाणे अपरिहार्य असल्याचे नमूद केले आहे. स्व.राजीव गांधी यांनी आणलेला पीसीओ आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीची मुहूर्तमेढ करणारा ठरला होता. त्यामुळे वाय-फाय सुविधा ही नागरी सुविधेचा एक आवश्यक भाग झाल्यामुळे विकासाच्या संकल्पनेला अनुसरून प्रस्तुत योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे आ. सपकाळ यांनी सांगितले.