शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अर्थसंकल्प: शेतकऱ्यांना दिलासा, पण हमीभावाचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:06 IST

या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांची बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठीची क्रयशक्ती वाढविण्यासाठीची गरज होती.

अकोला : यावर्षीचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर करू न शेतकऱ्यांसह करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला; परंतु यामध्ये शेतकरी, शेतमजुरांचा विचार करण्यात आला नाही. लघू उद्योजकाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे; मात्र अर्थव्यवस्थेला चालना देणाºया बांधकाम उद्योगासाठी काहीच घोषणा नसल्याने क्रेडाईच्या पदाधिकाºयांनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, तज्ज्ञांनी रेल्वे, एअर इंडिया, एलआयसी, बँकांचे खासगीकरण करणे आणि एलआयसीचा आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव चुकीचा असल्याचे सांगितले. एकूण यावर्षीच्या अर्थसंकल्पाबाबत सर्वच क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांची बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठीची क्रयशक्ती वाढविण्यासाठीची गरज होती. शेती व ग्रामीण भागासाठी मोठ्या तरतुदीची अपेक्षा होती. प्रत्यक्षात बघितल्यास शेती व ग्राम विकास मिळून केवळ २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात २ लाख ६८ हजार १२० लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. गतवर्षीचा व यावर्षीचा अर्थसंकल्प बघितल्यास यात केवळ १५ हजारांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे. तीही वाढ किसान सन्मान योजनेमुळे वाढली आहे. किसान सन्मान योजना उत्तम असली तरी हा अर्थसंकल्प शेतकºयांच्या बाबतीत निराशाजनक आहे. शेतीचे उत्पन्न येत्या दोन वर्षांत दुप्पट करण्याचा केंद्र शासनाचा धोरण आहे. तथापि, त्यानुषंगाने या अर्थसंकल्पात ठोस असे काहीच नसल्याचे शेतकरी तज्ज्ञांचे मत आहे. काहींनी ज्या घोषणा शेतकºयांसाठी केल्या त्यांची अंमलबजावणी तरी करावी, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. केंद्र शासनाला हमीभाव व नोकरदारांचा पगार यात अंतर वाटत नाही. त्यांना किमान आधारभूतवरच शेतकºयांना तगवायच आहे. सरकारने बाजार खुला करण्याचे काम करावे, असेही मत तज्ज्ञांनी मांडले. या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे, एअर इंडिया, एलआयसी, बँकांचे खासगीकरण करणे आणि एलआयसीचा आणि आयडीबीआय बँकेतला मोठा समभाग विकण्याचा प्रस्ताव चुकीचा आहे. तेजस एक्स्प्रेससारख्या खासगी रेल्वेगाड्या धावणार असल्याने, केंद्र शासनाच्या उत्पन्नात घट होईल. बजेटमध्ये उत्पन्न वाढीचे स्रोत नाहीत. कामगार, शेतकरी, विद्यार्थी, मध्यम वर्गीयांसाठी कोणतीही भरीव तरतूद बजेटमध्ये नाही. उद्योग, आरोग्यासाठी भरघोस तरतूद ही समाधानाची बाब आहे; परंतु निराशा करणारे बजेट असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांनी मांडले. वैद्यकीय उपकरणाचे दर वाढल्याने उपचारही महागणार असल्याने त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbudget 2020बजेटagricultureशेती