शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

आठ कोल्हापुरी बंधा-यांचे पितळ उघडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 02:45 IST

समितीची संयुक्त पाहणी; एकाही बंधा-यात पाणी थांबतच नाही.

अकोला, दि. २१- शेतीचे सिंचन वाढवून शेतकर्‍यांना मदत होण्यासाठी लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरने तयार केलेले बंधारे डोकेदुखीच अधिक ठरले आहेत. प्रत्यक्ष भेटीत पाहणी केलेल्या कोणत्याही बंधार्‍यात पाणी थांबतच नसल्याची नोंद संयुक्त समितीने केली आहे. कोल्हापुरी बंधार्‍यांची सद्यस्थिती तपासून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरणासाठी संयुक्त समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी आठ बंधार्‍यांची पाहणी करण्यात आली. ह्यलोकमतह्णने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर समितीकडून ही तपासणी होत आहे.गेल्या काही वर्षात १00 हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरले. त्या बंधार्‍यांची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपर्यंत स्थानिक स्तरकडून माहितीच मिळाली नाही. बंधार्‍याचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकर्‍यांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती मागवण्यात आली. ती देण्यासही उशीर झाला. त्यामुळे संयुक्त समितीचा दौरा सातत्याने पुढे ढकलला.सहा गावांतील आठ बंधा-यांची पाहणीसंयुक्त समितीने हिंगणा-शेळद, धाडी-बल्हाडी-२, तांदळी, चिंचोली गणू, मळसूर, चान्नी या गावातील आठ कोल्हापुरी बंधार्‍यांची स्थळावर पाहणी केली. त्यामध्ये सिंचनापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याला जबाबदार असलेल्या त्रुटी मोठय़ा प्रमाणात आढळल्या. दौर्‍यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख, स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता श्याम बोके, लघुसिंचनचे उपअभियंता पी.डब्ल्यू.तायडे, शाखा अभियंता आर.जे.गिरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.बंधार्‍यांचे गेट गायब, स्लॅबही नाहीसमितीने भेट दिलेल्या सर्वच बंधार्‍यांमध्ये पाणी थांबतच नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये बंधार्‍यांत टाकण्यासाठी असलेले गेटच नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी तर जाग्यावर ते उपलब्धही नाहीत. चान्नी बंधार्‍याला २४ गेट असताना केवळ १५ च आहेत.  गेटबाबत विचारणा केली असता, शेड मधे असल्याचे सांगण्यात आले; मात्र चावी नसल्याचे कारणही देण्यात आले. तांदळी येथे दुरुस्तीसाठी दहा लाख मिळाल्यानंतरही दुरुस्ती झाली नसल्याचे ग्रामस्थांनी समितीला सांगितले.