शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

आठ कोल्हापुरी बंधा-यांचे पितळ उघडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2017 02:45 IST

समितीची संयुक्त पाहणी; एकाही बंधा-यात पाणी थांबतच नाही.

अकोला, दि. २१- शेतीचे सिंचन वाढवून शेतकर्‍यांना मदत होण्यासाठी लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरने तयार केलेले बंधारे डोकेदुखीच अधिक ठरले आहेत. प्रत्यक्ष भेटीत पाहणी केलेल्या कोणत्याही बंधार्‍यात पाणी थांबतच नसल्याची नोंद संयुक्त समितीने केली आहे. कोल्हापुरी बंधार्‍यांची सद्यस्थिती तपासून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरणासाठी संयुक्त समितीचा दौरा मंगळवारपासून सुरू झाला. यावेळी आठ बंधार्‍यांची पाहणी करण्यात आली. ह्यलोकमतह्णने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर समितीकडून ही तपासणी होत आहे.गेल्या काही वर्षात १00 हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तर यांच्याकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ह्यलोकमतह्णने वृत्त लावून धरले. त्या बंधार्‍यांची तपासणी करण्यासाठी चार महिन्यांपर्यंत स्थानिक स्तरकडून माहितीच मिळाली नाही. बंधार्‍याचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकर्‍यांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती मागवण्यात आली. ती देण्यासही उशीर झाला. त्यामुळे संयुक्त समितीचा दौरा सातत्याने पुढे ढकलला.सहा गावांतील आठ बंधा-यांची पाहणीसंयुक्त समितीने हिंगणा-शेळद, धाडी-बल्हाडी-२, तांदळी, चिंचोली गणू, मळसूर, चान्नी या गावातील आठ कोल्हापुरी बंधार्‍यांची स्थळावर पाहणी केली. त्यामध्ये सिंचनापासून शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याला जबाबदार असलेल्या त्रुटी मोठय़ा प्रमाणात आढळल्या. दौर्‍यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता ए.व्ही. देशमुख, स्थानिक स्तरचे कार्यकारी अभियंता श्याम बोके, लघुसिंचनचे उपअभियंता पी.डब्ल्यू.तायडे, शाखा अभियंता आर.जे.गिरी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.बंधार्‍यांचे गेट गायब, स्लॅबही नाहीसमितीने भेट दिलेल्या सर्वच बंधार्‍यांमध्ये पाणी थांबतच नाही. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. त्यामध्ये बंधार्‍यांत टाकण्यासाठी असलेले गेटच नादुरुस्त आहेत. काही ठिकाणी तर जाग्यावर ते उपलब्धही नाहीत. चान्नी बंधार्‍याला २४ गेट असताना केवळ १५ च आहेत.  गेटबाबत विचारणा केली असता, शेड मधे असल्याचे सांगण्यात आले; मात्र चावी नसल्याचे कारणही देण्यात आले. तांदळी येथे दुरुस्तीसाठी दहा लाख मिळाल्यानंतरही दुरुस्ती झाली नसल्याचे ग्रामस्थांनी समितीला सांगितले.