शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उज्ज्वलाच्या लाभार्थींंच्या माहितीचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:03 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.

ठळक मुद्देगॅस कंपन्या, वितरकांकडून प्रचंड त्रासराजेश्‍वर एजन्सी संचालकाचा उद्दामपणासमन्वयक सक्सेना यांच्याकडे दुसर्‍यांदा तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.अशुद्ध इंधनावर केलेल्या स्वयंपाकातून होणारे मृत्यू टाळणे,  प्रदूषण कमी करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री  उज्ज्वला गॅस पुरवठा योजना सुरू केली. २0११ च्या  जनगणनेनुसार गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जातो.  त्या कुटुंबांना १६00 रुपये मदत देण्याचीही तरतूद त्यामध्ये  आहे. जनगणना यादीत नाव असलेल्या गरीब कुटुंबांना पुरवठा  देण्याची जबाबदारी तीनही गॅस कंपन्यांना देण्यात आली. कं पन्यांनी सर्व वितरकांना लाभार्थींंचे अर्ज घेऊन पुरवठा  देण्याचे बजावले; मात्र योजनेत पात्र असलेल्या लाभार्थींंंची  यादी कोठे आहे, याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर आहे.  त्यापैकी किती लोकांनी कोणाकडे अर्ज सादर केले, याची  एकत्रित माहिती संबंधित कंपन्यांकडे आहे. त्या कंपन्यांनी  वितरकांकडे यादी दिली. ती यादी योजनेवर लक्ष ठेवणारी  यंत्रणा म्हणून पुरवठा विभागाकडे अद्यापही दिलेली नाही. तसेच योजनेचा लाभ दिला जातो की नाही, याबाबतचा पाठ पुरावा करण्यासाठी कंपन्यांनी विभागीय मार्केटिंग  अधिकार्‍यांना जबाबदारी दिली; मात्र सर्वसामान्य लाभार्थी  त्यांच्याशी कधी संपर्क करणार, तक्रार जिल्हा पुरवठा  अधिकार्‍यांकडे कधी करणार, या घोळात गेल्या अनेक  महिन्यांपासून जिल्हय़ातील हजारो लाभार्थींंना चकरा  मारण्याची वेळ एजन्सीधारकांनी आणली आहे. त्यामुळे  प्रधानमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेबद्दल लाभ नको, वि तरकांना आवरा, असेच म्हणण्याची वेळ लाभार्थींंंवर आली  आहे.