शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

उज्ज्वलाच्या लाभार्थींंच्या माहितीचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:03 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.

ठळक मुद्देगॅस कंपन्या, वितरकांकडून प्रचंड त्रासराजेश्‍वर एजन्सी संचालकाचा उद्दामपणासमन्वयक सक्सेना यांच्याकडे दुसर्‍यांदा तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.अशुद्ध इंधनावर केलेल्या स्वयंपाकातून होणारे मृत्यू टाळणे,  प्रदूषण कमी करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री  उज्ज्वला गॅस पुरवठा योजना सुरू केली. २0११ च्या  जनगणनेनुसार गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जातो.  त्या कुटुंबांना १६00 रुपये मदत देण्याचीही तरतूद त्यामध्ये  आहे. जनगणना यादीत नाव असलेल्या गरीब कुटुंबांना पुरवठा  देण्याची जबाबदारी तीनही गॅस कंपन्यांना देण्यात आली. कं पन्यांनी सर्व वितरकांना लाभार्थींंचे अर्ज घेऊन पुरवठा  देण्याचे बजावले; मात्र योजनेत पात्र असलेल्या लाभार्थींंंची  यादी कोठे आहे, याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर आहे.  त्यापैकी किती लोकांनी कोणाकडे अर्ज सादर केले, याची  एकत्रित माहिती संबंधित कंपन्यांकडे आहे. त्या कंपन्यांनी  वितरकांकडे यादी दिली. ती यादी योजनेवर लक्ष ठेवणारी  यंत्रणा म्हणून पुरवठा विभागाकडे अद्यापही दिलेली नाही. तसेच योजनेचा लाभ दिला जातो की नाही, याबाबतचा पाठ पुरावा करण्यासाठी कंपन्यांनी विभागीय मार्केटिंग  अधिकार्‍यांना जबाबदारी दिली; मात्र सर्वसामान्य लाभार्थी  त्यांच्याशी कधी संपर्क करणार, तक्रार जिल्हा पुरवठा  अधिकार्‍यांकडे कधी करणार, या घोळात गेल्या अनेक  महिन्यांपासून जिल्हय़ातील हजारो लाभार्थींंना चकरा  मारण्याची वेळ एजन्सीधारकांनी आणली आहे. त्यामुळे  प्रधानमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेबद्दल लाभ नको, वि तरकांना आवरा, असेच म्हणण्याची वेळ लाभार्थींंंवर आली  आहे.