शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

उज्ज्वलाच्या लाभार्थींंच्या माहितीचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:03 IST

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.

ठळक मुद्देगॅस कंपन्या, वितरकांकडून प्रचंड त्रासराजेश्‍वर एजन्सी संचालकाचा उद्दामपणासमन्वयक सक्सेना यांच्याकडे दुसर्‍यांदा तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ग्रामीण  भागातील कुटुंबांना गॅस पुरवठा देण्याची योजना कंपन्या  आणि वितरकांच्या मनमानीमुळे प्रचंड त्रासाची ठरत आहे.  विशेष म्हणजे, योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी  प्रशासकीय स्तरावर कुठलीच माहिती उपलब्ध नसल्याने  समन्वयासाठी नेमलेल्या पुरवठा विभागाला कंपन्या, वि तरकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. परिणामी,  हजारो लाभार्थींंना एजन्सीधारकांकडे केवळ चकरा  मारण्याची वेळ आली आहे. अकोला शहरातील राजेश्‍वर  गॅस एजन्सीमध्ये हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू  आहे.अशुद्ध इंधनावर केलेल्या स्वयंपाकातून होणारे मृत्यू टाळणे,  प्रदूषण कमी करणे, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री  उज्ज्वला गॅस पुरवठा योजना सुरू केली. २0११ च्या  जनगणनेनुसार गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जातो.  त्या कुटुंबांना १६00 रुपये मदत देण्याचीही तरतूद त्यामध्ये  आहे. जनगणना यादीत नाव असलेल्या गरीब कुटुंबांना पुरवठा  देण्याची जबाबदारी तीनही गॅस कंपन्यांना देण्यात आली. कं पन्यांनी सर्व वितरकांना लाभार्थींंचे अर्ज घेऊन पुरवठा  देण्याचे बजावले; मात्र योजनेत पात्र असलेल्या लाभार्थींंंची  यादी कोठे आहे, याची माहिती ग्रामपंचायत स्तरावर आहे.  त्यापैकी किती लोकांनी कोणाकडे अर्ज सादर केले, याची  एकत्रित माहिती संबंधित कंपन्यांकडे आहे. त्या कंपन्यांनी  वितरकांकडे यादी दिली. ती यादी योजनेवर लक्ष ठेवणारी  यंत्रणा म्हणून पुरवठा विभागाकडे अद्यापही दिलेली नाही. तसेच योजनेचा लाभ दिला जातो की नाही, याबाबतचा पाठ पुरावा करण्यासाठी कंपन्यांनी विभागीय मार्केटिंग  अधिकार्‍यांना जबाबदारी दिली; मात्र सर्वसामान्य लाभार्थी  त्यांच्याशी कधी संपर्क करणार, तक्रार जिल्हा पुरवठा  अधिकार्‍यांकडे कधी करणार, या घोळात गेल्या अनेक  महिन्यांपासून जिल्हय़ातील हजारो लाभार्थींंना चकरा  मारण्याची वेळ एजन्सीधारकांनी आणली आहे. त्यामुळे  प्रधानमंत्र्यांच्या नावे असलेल्या योजनेबद्दल लाभ नको, वि तरकांना आवरा, असेच म्हणण्याची वेळ लाभार्थींंंवर आली  आहे.