शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पहिल्याच पावसात चार महिन्यांपूर्वी निर्मित पूल उखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 15:52 IST

निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कनिहिदा : दोनद खुर्द येथील चार महिन्यांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या पूल पहिल्याच मुसळधार पावसामुळे उखडून गेला आहे. त्यामुळे पुलाच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. यासोबतच परिसरात शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांची शेतजमीन खरडून गेली आहे.मुसळधार पावसामुळे पूल तर वाहून गेला; परंतु पुलाची उंची न वाढविल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरातील ऊर्मिला देवानंद लाखे, नीलेश कावरे, पंकज टिंगरे, राजू पाटील काकड, दीपक तिवले, सुभाष जामनिक, मनोहर महल्ले, संजय टिकार, यासह अनेक शेतकऱ्यांचे पुलामुळे मोठे नुकसान झाले आहे. या रस्त्याचे बांधकाम हायब्रीड एन्यूईटी कंपनी करीत असली तरी देखरेखीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झाले आहे.पुलाचे बांधकाम सुरू असताना, येथील शेतकºयांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील महल्ले यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन पुलाची उंची वाढविण्याची मागणी केली होती; परंतु त्याची अधिकाºयांनी दखल घेतली नाही. पुलाची उंची वाढविली असती तर शेतकºयांची शेतजमीन व पिके खरडून गेली नसती. शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्याकडेही शेतकºयांनी तक्रार केली होती. तक्रारीनुसार धोत्रे यांनी कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन पुलाची उंची वाढविण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याकडेही अधिकाºयाने कानाडोळा केला. निष्कृष्ट बांधकाम केल्यामुळे हा पूल पहिल्याच पावसात खरडून गेला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी आणि नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी आणि पुलाची उंची वाढवून नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.दोनद येथील पुलामुळे शेतकºयांची शेती खरडून गेली. शेती नुकसानबाबत पंचनामे करून शेतकºयांच्या मदतीसाठी प्रयत्न करू. उखडलेला पुलाची दुरुस्ती करण्यात येईल.- उमेश वानखडे, उपअभियंता सा.बां. विभाग, मूर्तिजापूर

टॅग्स :Akolaअकोलाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग