शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 10:47 IST

Bribery Cases in Akola : कोरोनातील दीड वर्षांच्या काळातही ८५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- सचिन राऊत

अकाेला : आधी २०१६ मध्ये नोटाबंदी झाली. त्यानंतर उद्योग व्यवसायांवर परिणाम झाला. तशीच परिस्थिती कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये झाली. मात्र तरीही नोटाबंदी आणि कोरोनाच्या संचारबंदीतही लाचखोरी जोरात असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती विभागात केलेल्या कारवायांवरून समाेर आले आहे़. गेल्या साडेपाच वर्षात अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीच्या ५४१ तक्रारी आल्या. तर कोरोनातील दीड वर्षांच्या काळातही ८५ तक्रारी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुळात, लाच देणे आणि घेणे हे दोन्हीही बेकायदा आहे. परंतु, आपले काम विनाविलंब व्हावे, यासाठी कधी कधी सामान्य नागरिक हे कायदेशीर किंवा बेकायदा कामे विनाअडथळा होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अगदी महसूल अधिकाऱ्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाचेचे आमिष दाखवितात. तर काही वेळा याच अधिकाऱ्यांकडून अशा लाचेची मागणी केली जाते. लाच दिली जात नाही तोपर्यंत अडवणूक केली जाते. परंतु, नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा लाचखोरांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

पोलीस आणि महसूल खाते आघाडीवर

२०२१ मध्ये अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३१ जुलैपर्यंत लाचेची ५९ प्रकरणे दाखल झाली. यात सर्वाधिक सात प्रकरणे महसूल विभागाच्या विरोधातील आहेत़ त्यापाठोपाठ पाेलीस विभाग पाच, महानगरपालिकेच्या चार तर जिल्हा परिषदेतील चार लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे़

 

लाच ५०० पासून पाच लाखांपर्यंत...

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या पिंजर येथील एका अभियंत्याने ५०० रुपयांची लाच मागितली हाेती़ या लाचखाेरी प्रकरणात अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या लाचखाेर अभियंत्यास अटक केली हाेती़ यावरून ५०० रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत लाच मागण्यात येत असल्याचे वास्तव आहे़

आराेग्य विभागातील आराेग्य उपसंचालक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली हाेती़ या प्रकरणात अकाेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित अधिकाऱ्यास लाचेतील पहिला हप्ता घेतांना रंगेहाथ अटक केली हाेती़ तर घरझडतीमध्येही माेठ्या प्रमाणात रक्कम आढळली हाेती़

‘‘शासकीय कामांसाठी कोणी लाचेसाठी अडवणूक करीत असेल तर न डगमगता सरकारी कर्मचारी किंवा अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींविरुद्ध नागरिकांनी तक्रार करावी. तक्रार केल्यानंतर आपले काम होणार नाही, अशी एक अनाठायी भीती असते. परंतू, ते काम कायदेशीर असेल तर ते होण्यासाठी एसीबीकडूनही पाठपुरावा केला जातो. त्यामुळे कोणी लाच देणे घेणे करू नये. तक्रार आली तर एसीबीकडून शहानिशा करून कारवाई केली जाते.

- शरद मेमाने उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकाेला

 

...........................

वर्ष लाच प्रकरणे

२०१६- ११०

२०१७-८७

२०१८- ९७

२०१९- १०३

२०२०- ८५

२०२१ (३१ जुलैपर्यंत)-५९

टॅग्स :AkolaअकोलाBribe Caseलाच प्रकरण