शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

जलशक्ती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 18:13 IST

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या महत्त्वाच्या उपक्रमाला ब्रेक लागल्याची माहिती आहे.

अकोला : पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या पहिल्या टप्प्यात १ जुलै ते १५ सप्टेंबर दरम्यान पाणी संचयाच्या विविध उपाययोजना करण्यासाठी राज्य स्तरावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली, त्यानंतर १ आॅक्टोबरपासून मुल्यमापनाच्या दुसºया टप्प्याच्या अंमलबजावणीची कोणतीही माहिती आता पुढे आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या महत्त्वाच्या उपक्रमाला ब्रेक लागल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने या अभियानातील उपक्रम ठरवून दिले आहेत.विविध राज्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी केंद्र, राज्य, जिल्हा, पंचायत समिती स्तरावर अधिकाºयांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्रालय स्तरावर या अभियानात २५७ उपसचिव, संयुक्त सचिवांची नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी २३ अधिकाºयांना काही जिल्ह्यांची विशेष जबाबदारी सोपविली. सोबतच राष्ट्रीय स्तरावरील स्वयंसेवी संस्थांकडून समाजप्रबोधन करण्याचे ठरले. त्यांचा कोणताही कार्यक्रम या दरम्यान जिल्ह्यांमध्ये झालाच नाही. त्यामध्ये शास्त्रज्ञ, भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे तांत्रिक अधिकारीही मार्गदर्शन करणार होते. मात्र, त्या कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन जिल्हास्तरावर प्राप्त झालेले नाही. राज्य स्तरावर नोडल अधिकारी म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव, ग्रामविकास, पाणी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांची नियुक्ती करण्याचेही त्यामध्ये म्हटले होते. जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाºयांकडून दोन अधिकाºयांची नियुक्ती त्यासाठी करणे अपेक्षित होते. मात्र, तेही झाले नाही. पंचायत समिती स्तरावर ४४७ उपसचिव, संचालक यांच्यासह केंद्रीय पाणी आयोग, केंद्रीय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे तांत्रिक अधिकाºयांना जबाबदारी देण्यात आली. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे, १ जुलै ते १५ सप्टेंबरदरम्यान सहभागी जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम करणे आवश्यक होते. त्यामध्ये मुख्यत: पावसाळ्यात पाण्याचा संचय करण्यासाठी विविध उपाययोजनांचे मार्गदर्शन तसेच ती कामे करवून घेण्याचा समावेश आहे.दुसºया टप्प्यात १ आॅक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये पाणी संचयासाठी केलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करण्याचे नियोजन आहे. त्या तपासणीनंतरच अभियानाची फलनिष्पत्ती ठरणार आहे. याबाबतचे संपूर्ण वेळापत्रक केंद्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाने दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी सुरूच झालेली नाही. त्यातच राज्यात विधानसभा निवडणुक प्रक्रीया तसेच आचारसंहिता सुरू झाल्याने या उपक्रमाला ब्रेक लागला आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना