शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जनता भाजी बाजारातील दुकाने हटविण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

अकाेला : राज्याचे महसूलमंत्री ना़ बाळासाहेब थाेरात यांनी जनता भाजी बाजार व जुने बसस्थानकाच्या जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेला स्थगिती ...

अकाेला : राज्याचे महसूलमंत्री ना़ बाळासाहेब थाेरात यांनी जनता भाजी बाजार व जुने बसस्थानकाच्या जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेला स्थगिती दिल्यानंतरही मनपा प्रशासनाने व्यावसायिकांची सुनावणी घेतली कशी, असा सवाल शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयाेजित बैठकीत उपस्थित केला असता, बाजारातील दुकाने हटविण्याची सर्व प्रक्रिया थांबवत असल्याचे मनपा आयुक्त नीमा अराेरा यांनी स्पष्ट केले़ मनपाच्या भूमिकेमुळे ६०० पेक्षा अधिक व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला आहे़

राज्यात जीवघेण्या काेराेना विषाणूमुळे सर्व लहानमाेठे उद्याेग, व्यवसाय पूर्णत: ठप्प झाले आहेत़ अशा संकटसमयी जीवनावश्यक सेवेतील भाजीपाला, फळविक्री करणाऱ्या व्यावसायिकांना उभारी देणे मनपाकडून अपेक्षित हाेते़ तसे न करता जनता भाजी बाजारातील दुकाने हटविण्यासाठी प्रशासनाच्या वेगवान हालचाली संशयाच्या घेऱ्यात सापडल्या हाेत्या़ दुकाने हटविण्यापूर्वी बाजारातील व्यावसायिकांसाठी मनपाने पर्यायी काेणती व्यवस्था केली, यासंदर्भात शिवसेना आ़ नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या दालनात बैठक घेण्याची विनंती केली असता ती मान्य करण्यात आली़ बैठकीत मनपाकडे व्यावसायिकांसाठी तसेच वाणिज्य संकुल उभारण्यासंदर्भात काेणताही ठाेस आराखडा तयार नसल्याची बाब समाेर आली़ या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी प्रा़ संजय खडसे, मनपा विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण, सेना गटनेता राजेश मिश्रा, जनता बाजार संघर्ष समितीचे अध्यक्ष सज्जाद हुसेन, प्रदीप वखारिया आदींसह संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित हाेते़

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पायदळी

काेराेनाच्या संकटात व्यावसायिकांना सुनावणीसाठी नाेटिसा दिल्याच कशा, असा सवाल उपस्थित करीत आ़ नितीन देशमुख यांनी मनपाने जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश पायदळी तुडविल्याचे सांगत आपत्ती निवारण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांच्या विराेधात फाैजदारी स्वरूपाची तक्रार दाखल का करू नये, असे मत व्यक्त केले़

आयुक्त म्हणाल्या, कागदपत्रे तपासायची हाेती!

बाजारातील दुकाने हटविण्याचा उद्देश नसून केवळ बाजारातील व्यावसायिकांकडे अधिकृत दस्तावेज उपलब्ध आहेत किंवा नाही, याची पडताळणी करायची हाेती, असे आयुक्त नीमा अराेरा यांनी सांगितले़ त्यावरही कागदपत्रे बाजार व परवाना विभागात उपलब्ध असताना काेराेनाकाळात सुनावणीचा खटाटाेप कशासाठी, असा सवाल आ़ देशमुख यांनी उपस्थित केला असता त्यावर आयुक्तांनी चुप्पी साधणे पसंत केले़