शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

‘ब्रेक द चेन’मुळे उद्योगांना लागला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 09:55 IST

Akola MIDC News : जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग क्षेत्राला ‘ब्रेक’ लागला आहे.

ठळक मुद्देशहरात केवळ ४ टक्केच इनसाईट उद्योगउद्योग क्षेत्रावर मोठा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : राज्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लागू आहेत. जिल्ह्यात सोमवारपासून कडक निर्बंध लावण्यात आल्याने औद्योगिक क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार आहे. नियमानुसार इनसाईट उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी आहे. शहरात केवळ ४ ते ५ टक्केच इनसाईट उद्योग आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण उद्योग क्षेत्राला ‘ब्रेक’ लागला आहे.

अकोला जिल्ह्यात ७०० ते ८०० मोठे, मध्यम व लघुउद्योग आहेत. त्यापैकी ५० टक्के उद्योग कृषी आधारित आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या उद्योगांमध्ये हजारो मजूर काम करतात. मागीलवर्षी लॉकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. अनलॉकमध्ये नव्या जोमाने उद्योग सुरू झाले. उद्योग रुळावर येत असताना कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाल्याने संपूर्ण क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातही आता जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लावल्याने उद्योगांची चाके पुन्हा रुतली आहेत. जिल्ह्यातील जवळपास ९५ ते ९६ टक्के उद्योग बंद राहणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

 

औद्योगिक वसाहती आणि सुरू राहणारे उद्योग (टक्क्यांत)

अकोला - ४ टक्के

बाळापूर - २ टक्के

मूर्तिजापूर - २ टक्के

पातूर - ० टक्के

अकोट - ० टक्के

 

कामगारांना हवे काम

कोरोना काळात कामासाठी अडचणी येत आहेत. काही उद्योग सुरू असल्याने थोड्याफार प्रमाणात काम मिळत होते. आता कडक निर्बंधांमुळे उद्योग बंद राहणार आहेत. पुन्हा रोजगार मिळणार की नाही? सांगता येत नाही.

- बाबुलाल नेमाडे

 

रोजगार मिळत नसल्याने घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. उद्योगही कमी प्रमाणात सुरू असल्याने कामही मिळत नाही. एखाद्यावेळी दोन दिवसांचे काम मिळते, पण जास्त काळ काम मिळत नाही.

- विष्णू पाटील

 

उद्योजकांच्या अडचणी वेगळ्या

जिल्ह्यात ३ ते ५ टक्केच इनसाईट उद्योग आहेत. मालक, सुपरवायझर यांना जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे सगळ्याच उद्योगांवर परिणाम होणार आहे. उद्योजक पुन्हा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

- उन्मेश मालू, उद्योजक

 

आधीच काम कमी होते. उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू झाले नव्हते. या निर्बंधामुळे उद्योग पूर्णपणे बंद राहणार आहेत. माल पडून राहणार असल्याने उद्योजक आर्थिक संकटात लोटला जाण्याची शक्यता आहे.

- श्रीकांत पडगीलवार, उद्योजक

 

या निर्बंधांमध्ये उद्योग सुरू ठेवायला परवानगी द्यायला हवी होती. एकवेळ बंद झालेले उद्योग पुन्हा रुळावर यायला मोठा कालावधी लागतो. उद्योजकांचे झालेले नुकसान भरून निघत नाही. आर्थिक अडचणी वाढतात.

- हरेश शाह, उद्योजक

 

कच्चा माल मिळण्यास अडचणी

राज्यात संचारबंदी लागू असल्याने कच्चा माल मिळण्यास अडचणी येत आहेत. उत्पादनांचा पुरवठा, पॅकेजिंग, मटेरिअल, यंत्रांचे सुटे भाग मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश उद्योग अडचणीत आले आहेत. अनेक उद्योगांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे. हे नुकसान भरून निघायला अजून बराच कालावधी लागणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ