शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
3
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
4
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
5
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
6
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
7
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
8
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
9
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
10
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
11
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
12
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
13
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
14
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

साहित्य संमेलनावर विठ्ठल वाघ यांचाही बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 14:28 IST

अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आ

अकोला: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून प्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रणच रद्द करण्याचा निर्णयाचा सर्वत्र निषेध होत आहे. प्रख्यात वºहाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनीही संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले आहे. सोबतच स्त्रीत्वाच्या अपमानाच्या मुद्द्यावर भूमिका घेत संमेलनाच्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनीही संमेलनाला जाऊ नये, असे आवाहनही डॉ. वाघ यांनी केले आहे.९२ वे मराठी साहित्य संमेलन ११, १२ व १३ जानेवारीला होत आहे. या संमेलनावर उठलेली वादळे शमताना दिसत नाही. इंग्रजी भाषेतून लिखाण करणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावल्यास संमेलन उधळून लावू, असा इशारा मनसेने दिला होता. त्यावर तडकाफडकी नयनतारा सहगल यांना ई-मेलद्वारे ‘उद्घाटक म्हणून आपले निमंत्रण रद्द समजावे’, असे पत्र पाठवण्यात आले. या प्रकाराचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच अनेकांनी संमेलनावरच बहिष्कार टाकला आहे. त्यात आता वºहाडातील प्रसिद्ध कवी डॉ. वाघ यांनीही निषेध करत संमेलनावर बहिष्कार असल्याचे जाहीर केले आहे. सहगल यांचा अपमान म्हणजे स्त्रीत्वाचा अपमान झाल्याच्या मुद्यावर संमेलनाच्या अध्यक्ष ढेरे यांनीही भूमिका घेऊन जाणे टाळावे, असेही डॉ. वाघ म्हणाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन