शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 22:11 IST

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच!

- राजेशशेगोकार

अकोला : अकोल्याच्या राजकीय सारीपाटावर अतिशय प्रबळ असलेल्या भाजपामध्ये अंतर्गत कलहामुळे महायुतीच्या सत्ताकाळातच दोन गट पडले. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वातील एक गटाने भाजपाची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य असतानाही डॉ. रणजित पाटील यांना भाजपात एकाकी पाडण्यात खासदार गट यशस्वी झाला. आता राज्यात भाजपाची सत्ता नाही, अशा काळातही भाजपातील दोन गटांमधील अंतर कमी झाले नसल्याचे चित्र परवा दृष्टीस आले. माजी राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अपूर्ण काम पूर्ण करून, मनुष्यबळाच्या वेतनासाठी तरतूद करण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनाकडे त्यांचे काही समर्थक वगळले तर इतर भाजपाच्या नेते व पदाधिकाºयांनी चक्क पाठ फिरविल्याचे दिसून आले. असा प्रकार काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वीही अनेक आंदोलने व कार्यक्रमांमध्ये भाजपामधील दोन गट स्वतंत्र कार्यरत दिसले आहेत; मात्र सत्ता गेल्यावर हे दोन्ही गट एकत्र येतील ही शक्यता उरलीच नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. खरे तर अकोल्याच्या भाजपावर ना. धोत्रे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वात आ. रणधीर सावरकर यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर कार्यविस्तार आधीच वाढविला होता. आता जिल्हाध्यक्ष पदामुळे या विस्ताराला अधिकार मिळाला आहे. त्यामुळे भाजपाचे पक्ष म्हणून जे आंदोलने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात झाले त्यामध्ये डॉ. पाटील व त्यांचे समर्थक दिसले नाहीत. तोच कित्ता डॉ. पाटील यांच्या धरणे आंदोलनात गिरविला गेला.

सुपर स्पेशालिटी व पोलीस आयुक्त कार्यालयासाठी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली; मात्र संपूर्ण कार्यकाळात या दोन्ही योजना पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. त्यांनी ठरविले असते तर त्यांच्या कार्यकाळातच हे रुग्णालय कार्यान्वित होऊ शकले असते. राज्याचे गृहराज्यमंत्री पद असतानाही त्यांनीच घोषणा केलेल्या पोलीस आयुक्तालयालाही मुहूर्त मिळाला नाही. उलट अकोल्याच्या नंतर घोषणा झालेली आयुक्तालये त्यांच्याच उपस्थितीत सुरू झाले हे वास्तव नाकारता येणार नाही. या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने का होईना डॉ. पाटील यांनी रस्त्यावर उतरून आपला गट कार्यान्वित ठेवण्यात यश मिळविले आहेच.

आता फक्त कार्यकर्ते सांभाळण्याचीही कसरत त्यांना करावी लागणार आहे. कारण एका गटाचा कार्यकर्ता दुसरीकडे दिसला की त्याचे काय होते, हे मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच अनुभवले आहे. भाजपातील दोन गटांमधील दुरावा हा संपेल तेव्हा संपेल; मात्र या निमित्ताने डॉ. पाटील यांनी लावून धरलेला मुद्दा राजकीय नजरेतून न पाहता शहराच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू होताच जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी सुपरस्पेशालिटी सुरू करण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यापर्यंत धाव घेतली होती. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही अकोल्यात येऊन हे रुग्णालय सुरू व्हावे अशी भूमिका पत्रपरिषदेत मांडली होती. त्यामुळे या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने तरी याची दखल शासनाने घेतली तर उत्तमच आहे. श्रेय कोणीही घेऊ द्या, फक्त सुपरस्पेशालिटी सुरू होऊ द्या, ही सामान्यांची भावना आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAkolaअकोला