शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 22:11 IST

सत्ता गेल्यावरही भाजपातील गटबाजी कायमच!

- राजेशशेगोकार

अकोला : अकोल्याच्या राजकीय सारीपाटावर अतिशय प्रबळ असलेल्या भाजपामध्ये अंतर्गत कलहामुळे महायुतीच्या सत्ताकाळातच दोन गट पडले. खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वातील एक गटाने भाजपाची सर्व सूत्रे आपल्या हाती ठेवली तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या किचन कॅबिनेटचे सदस्य असतानाही डॉ. रणजित पाटील यांना भाजपात एकाकी पाडण्यात खासदार गट यशस्वी झाला. आता राज्यात भाजपाची सत्ता नाही, अशा काळातही भाजपातील दोन गटांमधील अंतर कमी झाले नसल्याचे चित्र परवा दृष्टीस आले. माजी राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अपूर्ण काम पूर्ण करून, मनुष्यबळाच्या वेतनासाठी तरतूद करण्याच्या मागणीसाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या आंदोलनाकडे त्यांचे काही समर्थक वगळले तर इतर भाजपाच्या नेते व पदाधिकाºयांनी चक्क पाठ फिरविल्याचे दिसून आले. असा प्रकार काही पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वीही अनेक आंदोलने व कार्यक्रमांमध्ये भाजपामधील दोन गट स्वतंत्र कार्यरत दिसले आहेत; मात्र सत्ता गेल्यावर हे दोन्ही गट एकत्र येतील ही शक्यता उरलीच नसल्याचे या निमित्ताने अधोरेखित झाले. खरे तर अकोल्याच्या भाजपावर ना. धोत्रे यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वात आ. रणधीर सावरकर यांनी आपल्या मतदारसंघाबाहेर कार्यविस्तार आधीच वाढविला होता. आता जिल्हाध्यक्ष पदामुळे या विस्ताराला अधिकार मिळाला आहे. त्यामुळे भाजपाचे पक्ष म्हणून जे आंदोलने जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात झाले त्यामध्ये डॉ. पाटील व त्यांचे समर्थक दिसले नाहीत. तोच कित्ता डॉ. पाटील यांच्या धरणे आंदोलनात गिरविला गेला.

सुपर स्पेशालिटी व पोलीस आयुक्त कार्यालयासाठी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली; मात्र संपूर्ण कार्यकाळात या दोन्ही योजना पूर्णत्वास जाऊ शकल्या नाहीत. त्यांनी ठरविले असते तर त्यांच्या कार्यकाळातच हे रुग्णालय कार्यान्वित होऊ शकले असते. राज्याचे गृहराज्यमंत्री पद असतानाही त्यांनीच घोषणा केलेल्या पोलीस आयुक्तालयालाही मुहूर्त मिळाला नाही. उलट अकोल्याच्या नंतर घोषणा झालेली आयुक्तालये त्यांच्याच उपस्थितीत सुरू झाले हे वास्तव नाकारता येणार नाही. या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने का होईना डॉ. पाटील यांनी रस्त्यावर उतरून आपला गट कार्यान्वित ठेवण्यात यश मिळविले आहेच.

आता फक्त कार्यकर्ते सांभाळण्याचीही कसरत त्यांना करावी लागणार आहे. कारण एका गटाचा कार्यकर्ता दुसरीकडे दिसला की त्याचे काय होते, हे मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच अनुभवले आहे. भाजपातील दोन गटांमधील दुरावा हा संपेल तेव्हा संपेल; मात्र या निमित्ताने डॉ. पाटील यांनी लावून धरलेला मुद्दा राजकीय नजरेतून न पाहता शहराच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचाच आहे. कोरोनाचा उद्रेक सुरू होताच जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी सुपरस्पेशालिटी सुरू करण्याबाबत थेट मुख्यमंत्र्यापर्यंत धाव घेतली होती. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही अकोल्यात येऊन हे रुग्णालय सुरू व्हावे अशी भूमिका पत्रपरिषदेत मांडली होती. त्यामुळे या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने तरी याची दखल शासनाने घेतली तर उत्तमच आहे. श्रेय कोणीही घेऊ द्या, फक्त सुपरस्पेशालिटी सुरू होऊ द्या, ही सामान्यांची भावना आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAkolaअकोला