शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शेतकऱ्यांसाठी आंदोलन: भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

By atul.jaiswal | Updated: December 4, 2017 22:15 IST

अकोला : शेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला होता ठिय्यारविकांत तुपकर व शेकडो शेतकºयांनाही घेतले ताब्यात

अकोला : शेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी शेतकरी जागर मंचाने सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून, या आंदोलनाअंतर्गत जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतल्या नंतर  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आंदोलकांना भेट देऊन त्यांचे म्हणने ऐकुन घेतले. या बोलणीदरम्यान आंदोलकांचे समाधान झाले नाही.  पुढील एक तासात प्रशासनाने शेतकºयांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर शेतकरी काहीही करण्यास मोकळे आहेत, असा ‘अल्टिमेटम’ यशवंत सिन्हा यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना दिला होता. तासाभरात प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांना भेटण्याची गळ घातली; परंतु जिल्हाधिकाºयांनी भेटण्यास मनाई केली. त्यानंतर  पोलिसांनी यशवंत सिन्हा, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे यांच्यासह आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

 नाफेडचे उडीद, मूग, सोयाबीन व तूर विक्रीसाठी असलेले क्लिष्ट नियम बदलून, शेतकºयांचा शेतमाल हमीभावाने विकत घ्यावा, आर्थिक अडचणीतून शेतकºयाला बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्व शेतमालासाठी भावांतराची योजना लागू करावी. कपाशीवरील बोंडअळीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ५0 हजार नुकसान भरपाई द्यावी, शेतकºयांना व्याज व दंडासह आकारलेल्या अवाजवी वीज देयक पाठविले आणि वीज तोडणी सुरू केली. हे थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा, पीक विमा तातडीने देण्यात यावा आणि त्यावर तोडगा काढावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, दुष्काळी अनुदान द्यावे, सोनेतारण कर्जमाफीपासून वंचित ३५ हजार शेतकºयांना न्याय द्यावा, कर्जमाफी फसवी असल्यामुळे या योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलावे आणि शेतकºयांच्या मुलांची तीन वर्षांपासून थकीत शिष्यवृत्ती द्यावी या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाने आंदोलन छेडले आहे.