शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

शेतकऱ्यांसाठी आंदोलन: भाजपा नेते यशवंत सिन्हा यांना अकोल्यात अटक

By atul.jaiswal | Updated: December 4, 2017 22:15 IST

अकोला : शेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला होता ठिय्यारविकांत तुपकर व शेकडो शेतकºयांनाही घेतले ताब्यात

अकोला : शेतकऱ्यांच्या  मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत सहभागी झाल्यानंतर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या देणारे भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा व त्यांच्या सहकाºयांना अकोला पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास अटक केली. शेतकऱ्यांच्या होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच शेतकºयांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी शेतकरी जागर मंचाने सरकारविरुद्ध एल्गार पुकारला असून, या आंदोलनाअंतर्गत जिल्हाभरातील शेतकºयांनी सोमवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. प्रशासनाने आमच्यापर्यंत येऊन आमचे म्हणने ऐकून घ्यावे, अशी भूमिका आंदोलक शेतकºयांनी घेतल्या नंतर  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आंदोलकांना भेट देऊन त्यांचे म्हणने ऐकुन घेतले. या बोलणीदरम्यान आंदोलकांचे समाधान झाले नाही.  पुढील एक तासात प्रशासनाने शेतकºयांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला नाही, तर शेतकरी काहीही करण्यास मोकळे आहेत, असा ‘अल्टिमेटम’ यशवंत सिन्हा यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना दिला होता. तासाभरात प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नाही. त्यामुळे आंदोलकांनी पुन्हा जिल्हाधिकाºयांना भेटण्याची गळ घातली; परंतु जिल्हाधिकाºयांनी भेटण्यास मनाई केली. त्यानंतर  पोलिसांनी यशवंत सिन्हा, शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे यांच्यासह आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.

 नाफेडचे उडीद, मूग, सोयाबीन व तूर विक्रीसाठी असलेले क्लिष्ट नियम बदलून, शेतकºयांचा शेतमाल हमीभावाने विकत घ्यावा, आर्थिक अडचणीतून शेतकºयाला बाहेर काढण्यासाठी शासनाने सर्व शेतमालासाठी भावांतराची योजना लागू करावी. कपाशीवरील बोंडअळीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी ५0 हजार नुकसान भरपाई द्यावी, शेतकºयांना व्याज व दंडासह आकारलेल्या अवाजवी वीज देयक पाठविले आणि वीज तोडणी सुरू केली. हे थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा, पीक विमा तातडीने देण्यात यावा आणि त्यावर तोडगा काढावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून, दुष्काळी अनुदान द्यावे, सोनेतारण कर्जमाफीपासून वंचित ३५ हजार शेतकºयांना न्याय द्यावा, कर्जमाफी फसवी असल्यामुळे या योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदलावे आणि शेतकºयांच्या मुलांची तीन वर्षांपासून थकीत शिष्यवृत्ती द्यावी या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाने आंदोलन छेडले आहे.