शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भाजप-काँग्रेस भांडवलदारांचे मांडलिक : ‘आप’चे ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांचा पत्रकार परिषदेत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:11 IST

​​​​​​​अकोला : केंद्रातील भाजप सरकार असो वा काँग्रेस पक्ष यांनी भांडवलदारांचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे देशातील १0 टक्के लोकांकडे ९0 टक्के संपत्ती केंद्रित झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रातील भाजप सरकार असो वा काँग्रेस पक्ष यांनी भांडवलदारांचे मांडलिकत्व स्वीकारल्यामुळे देशातील १0 टक्के लोकांकडे ९0 टक्के संपत्ती केंद्रित झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. सरकार मूठभर उद्योगपतींना पाठीशी घालत असल्यामुळे या देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात आम आदमी पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, केंद्र तसेच राज्य सरकारच्या तुघलकी निर्णयांमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘आप’चा सशक्त पर्याय असल्याची माहिती ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी दिली. देशातील बड्या उद्योग समूहांनी लोकशाहीचे अपहरण केले आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या घडीला भांडवलदारांचे मांडलिक झाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारला लोककल्याणाचा विसर पडला असून, ‘मेक इन इंडिया नव्हे, तर फेक इन इंडिया’मुळे भविष्यात देशात बेरोजगारीचे संकट निर्माण होणार असल्याचे सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले. आम आदमी पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन करून त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासह विकास कामांच्या योजना निकाली काढण्यात यश मिळवले आहे. पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम पाहूनच ‘आप’मध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे ब्रिगेडिअर सावंत यांनी सांगितले. केंद्रातील भाजप सरकार, विरोधी पक्ष काँग्रेस यांचा जातीय दंगली घडविणे हाच अजेंडा आहे. दोन्ही पक्षांची भूमिका पाहता सर्वसामान्य जनतेसमोर आम आदमी पक्षाचा पर्याय खुला आहे. त्यासाठी राज्यात आगामी तीन महिन्यांच्या कालावधीत पक्षाची विधानसभा मतदारसंघनिहाय संघटनात्मक बांधणी केली जाणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला सदानंद पवार, केतन देसाई, राहुल चव्हाण, कमांडर आलिम पटेल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शरद पवारांमुळेच शेतकरी संकटातराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच राज्यातील शेतकरी देशोधडीला लागल्याचा आरोप ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला. शरद पवार या देशाचे कृषिमंत्री होते. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील शेतकरी व शेती उत्पादित मालाला हमीभाव देण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाय योजना केल्या  नाहीत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी न करता पवार यांनी शेतकर्‍यांना संकटात ढकलल्याचे ब्रिगेडिअर सावंत यांनी सांगितले. 

टॅग्स :AAPआपAkola cityअकोला शहर