शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अकोला जिल्ह्यात बर्ड फ्लूसंदर्भात सतर्कतेचा इशारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 10:34 IST

Bird Flu News खबरदारी बाळगत पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासनाने राज्यभरात अलर्ट जारी केला आहे.पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

अकोला : सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट कायम असताना, देशात बर्ड फ्लूचे नवे संकट आले आहे. सुदैवाने राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा एकही अहवाल समोर आलेला नाही, मात्र खबरदारी बाळगत पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू झालेला नाही, मात्र सतर्कता बाळगत शासनाने राज्यभरात अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार, जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

निर्जंतुकीकरणावर भर

ग्रामपंचायत स्तरावर पक्ष्यांच्या खुराट्यांचे निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

मृत पक्ष्यांची होणार प्रयोगशाळेत तपासणी

जिल्ह्यात कुठेही मृत पक्षी आढळल्यास त्यांची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत मृत पक्षी भोपाळ किंवा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली आहे.

 

एखाद्या ठिकाणी अचानक अधिक संख्येने मृत पक्षी आढळल्यास ही बाब चिंताजनक असते. अशावेळी पक्ष्यांचे शवविच्छेदन न करता नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील हायसेक्युरिटी ॲनिमल डिसिज लॅबोरेटरी किंवा रोग अन्वेषण विभाग पुणे येथे सॅम्पल पाठवले जातात.

- डॉ. नम्रता वाघमारे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य