शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

बिरबल नाथांची नगरी मंगरुळपीर

By admin | Updated: October 28, 2016 12:03 IST

विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे.

नंदलाल पवार, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. २८ -  विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे. संत बिरबलनाथ संस्थानमुळेच या शहराला बिरबल नाथांची नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दिवाळीत विविध ठिकाणाहून भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते.  
 
श्री बिरबलनाथ महाराज हे मुळचे पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या तिरावर असणा-या चक्रपूर नावाच्या लहानशा गावाचे त्यांनी जीवनात प्रचंड परिक्रमा केली म्हणून त्यांना पृथ्वीनाथ असे म्हणतात. त्यांची बोली भाषा हिंदी होती हे नाथ संप्रदायाचे अनुयायी होते जेसनाथ हे त्यांचे गुरु होते. ‘झुले मे झुलता हे बाला, दुनिया का पालन करणेवाला’ हा त्यांचा आवडता मंत्र होता. नदीच्या संगमावर त्यांची भेट नेहमी भायजी महाराजांसोबत होत असे. वाघ, सिंहासारखे हिला पशू अगदी पाळीव प्राण्यांसारखे त्यांच्यासोबत राहत. धामणगावच्या मुंगसाजी महाराजांसोबत त्यांचे मधूर संबंध होते श्रीक्षेत्र कोंडोली येथे अतिवृष्टीझाली नदी नाले एक झाले. त्यावेळी बाबांच्या धुनीवर आणि त्यांच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडला नाही हा चमत्कार बघून पिंताबर महाराज धावून आले. त्यावेळी  शेगाव येथे गजानन महाराजांच्या भेटीस येण्यासाठी सांगितले म्हणून पिंताबर महाराजसोबत शेगावी आले तेथे ते गजानन महारांजासोबत १५ दिवस राहिले, असा उल्लेख आढळतो. आपण जीवंत समाधी घेणार असे त्यांनी भक्तांजवळ एक दिवशी सांगितले त्यामुळे हा परिसर ढवळून निघाला त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते जिवंत समाधी घेणे हा आत्महत्येचा प्रकार समजला जाई. म्हणून त्यावेळी गावचे प्रतिष्ठीत नागरिक लालसिंह जमादार यांनी अकोल्याला जाऊन त्यावेळेसचे जिल्हाधिकारी बॅनर्जी यांच्याकडे बिरबनलाथ महाराजांच्यावतीने नाथ महाराजांच्याच समाधीची परवानगी मागितली पण जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारून हा प्रकार स्वत: पाहण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर साधारण दीड महिन्यांनी जिल्हाधिकारी बॅनर्जी नियोजित वेळी आपल्या अनेक सहकारी अधिका-यासोेबत मंगरुळपीरला मंदिरात आले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी  बळजबरीने बॅनर्जी साहेबांच्या हातावर जळते निखारे ठेवले हातावरील निखा-यांचे तात्काळ पेढे झाले. हा चमत्कार बघून जिल्हाधिकारी स्तब्ध झाले आणि तांनी ताबडतोब समाधी घेण्यास परवानगी दिली. ४.२. १९२८ साली माघ वद्य पोर्णिमेला सायंकाळी ६ वाजता बाबा हजारो भक्तांसमोर पद्मासन लावून बसले आणि थोड्याच वेळेत त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९२९ सालापासून दरवर्षी मंगरुळपीरला यात्रा भरविली जाते.