शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

बिरबल नाथांची नगरी मंगरुळपीर

By admin | Updated: October 28, 2016 12:03 IST

विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे.

नंदलाल पवार, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. २८ -  विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे. संत बिरबलनाथ संस्थानमुळेच या शहराला बिरबल नाथांची नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दिवाळीत विविध ठिकाणाहून भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते.  
 
श्री बिरबलनाथ महाराज हे मुळचे पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या तिरावर असणा-या चक्रपूर नावाच्या लहानशा गावाचे त्यांनी जीवनात प्रचंड परिक्रमा केली म्हणून त्यांना पृथ्वीनाथ असे म्हणतात. त्यांची बोली भाषा हिंदी होती हे नाथ संप्रदायाचे अनुयायी होते जेसनाथ हे त्यांचे गुरु होते. ‘झुले मे झुलता हे बाला, दुनिया का पालन करणेवाला’ हा त्यांचा आवडता मंत्र होता. नदीच्या संगमावर त्यांची भेट नेहमी भायजी महाराजांसोबत होत असे. वाघ, सिंहासारखे हिला पशू अगदी पाळीव प्राण्यांसारखे त्यांच्यासोबत राहत. धामणगावच्या मुंगसाजी महाराजांसोबत त्यांचे मधूर संबंध होते श्रीक्षेत्र कोंडोली येथे अतिवृष्टीझाली नदी नाले एक झाले. त्यावेळी बाबांच्या धुनीवर आणि त्यांच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडला नाही हा चमत्कार बघून पिंताबर महाराज धावून आले. त्यावेळी  शेगाव येथे गजानन महाराजांच्या भेटीस येण्यासाठी सांगितले म्हणून पिंताबर महाराजसोबत शेगावी आले तेथे ते गजानन महारांजासोबत १५ दिवस राहिले, असा उल्लेख आढळतो. आपण जीवंत समाधी घेणार असे त्यांनी भक्तांजवळ एक दिवशी सांगितले त्यामुळे हा परिसर ढवळून निघाला त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते जिवंत समाधी घेणे हा आत्महत्येचा प्रकार समजला जाई. म्हणून त्यावेळी गावचे प्रतिष्ठीत नागरिक लालसिंह जमादार यांनी अकोल्याला जाऊन त्यावेळेसचे जिल्हाधिकारी बॅनर्जी यांच्याकडे बिरबनलाथ महाराजांच्यावतीने नाथ महाराजांच्याच समाधीची परवानगी मागितली पण जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारून हा प्रकार स्वत: पाहण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर साधारण दीड महिन्यांनी जिल्हाधिकारी बॅनर्जी नियोजित वेळी आपल्या अनेक सहकारी अधिका-यासोेबत मंगरुळपीरला मंदिरात आले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी  बळजबरीने बॅनर्जी साहेबांच्या हातावर जळते निखारे ठेवले हातावरील निखा-यांचे तात्काळ पेढे झाले. हा चमत्कार बघून जिल्हाधिकारी स्तब्ध झाले आणि तांनी ताबडतोब समाधी घेण्यास परवानगी दिली. ४.२. १९२८ साली माघ वद्य पोर्णिमेला सायंकाळी ६ वाजता बाबा हजारो भक्तांसमोर पद्मासन लावून बसले आणि थोड्याच वेळेत त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९२९ सालापासून दरवर्षी मंगरुळपीरला यात्रा भरविली जाते.