शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बिरबल नाथांची नगरी मंगरुळपीर

By admin | Updated: October 28, 2016 12:03 IST

विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे.

नंदलाल पवार, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. २८ -  विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे. संत बिरबलनाथ संस्थानमुळेच या शहराला बिरबल नाथांची नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दिवाळीत विविध ठिकाणाहून भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते.  
 
श्री बिरबलनाथ महाराज हे मुळचे पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या तिरावर असणा-या चक्रपूर नावाच्या लहानशा गावाचे त्यांनी जीवनात प्रचंड परिक्रमा केली म्हणून त्यांना पृथ्वीनाथ असे म्हणतात. त्यांची बोली भाषा हिंदी होती हे नाथ संप्रदायाचे अनुयायी होते जेसनाथ हे त्यांचे गुरु होते. ‘झुले मे झुलता हे बाला, दुनिया का पालन करणेवाला’ हा त्यांचा आवडता मंत्र होता. नदीच्या संगमावर त्यांची भेट नेहमी भायजी महाराजांसोबत होत असे. वाघ, सिंहासारखे हिला पशू अगदी पाळीव प्राण्यांसारखे त्यांच्यासोबत राहत. धामणगावच्या मुंगसाजी महाराजांसोबत त्यांचे मधूर संबंध होते श्रीक्षेत्र कोंडोली येथे अतिवृष्टीझाली नदी नाले एक झाले. त्यावेळी बाबांच्या धुनीवर आणि त्यांच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडला नाही हा चमत्कार बघून पिंताबर महाराज धावून आले. त्यावेळी  शेगाव येथे गजानन महाराजांच्या भेटीस येण्यासाठी सांगितले म्हणून पिंताबर महाराजसोबत शेगावी आले तेथे ते गजानन महारांजासोबत १५ दिवस राहिले, असा उल्लेख आढळतो. आपण जीवंत समाधी घेणार असे त्यांनी भक्तांजवळ एक दिवशी सांगितले त्यामुळे हा परिसर ढवळून निघाला त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते जिवंत समाधी घेणे हा आत्महत्येचा प्रकार समजला जाई. म्हणून त्यावेळी गावचे प्रतिष्ठीत नागरिक लालसिंह जमादार यांनी अकोल्याला जाऊन त्यावेळेसचे जिल्हाधिकारी बॅनर्जी यांच्याकडे बिरबनलाथ महाराजांच्यावतीने नाथ महाराजांच्याच समाधीची परवानगी मागितली पण जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारून हा प्रकार स्वत: पाहण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर साधारण दीड महिन्यांनी जिल्हाधिकारी बॅनर्जी नियोजित वेळी आपल्या अनेक सहकारी अधिका-यासोेबत मंगरुळपीरला मंदिरात आले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी  बळजबरीने बॅनर्जी साहेबांच्या हातावर जळते निखारे ठेवले हातावरील निखा-यांचे तात्काळ पेढे झाले. हा चमत्कार बघून जिल्हाधिकारी स्तब्ध झाले आणि तांनी ताबडतोब समाधी घेण्यास परवानगी दिली. ४.२. १९२८ साली माघ वद्य पोर्णिमेला सायंकाळी ६ वाजता बाबा हजारो भक्तांसमोर पद्मासन लावून बसले आणि थोड्याच वेळेत त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९२९ सालापासून दरवर्षी मंगरुळपीरला यात्रा भरविली जाते.