शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

महाराष्ट्रात अद्याप उभारले नाही बायोगॅस प्रशिक्षण केंद्र

By admin | Updated: October 7, 2015 22:57 IST

कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बंद पडण्याच्या प्रमाणात झाली वाढ.

सुनील काकडे/वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावागावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे; मात्र केंद्र शासनाचे १00 टक्के अनुदान उपलब्ध असतानाही अद्ययावत प्रशिक्षण देणारे एकही बायोगॅस डेव्हलपमेंट अँण्ड ट्रेनिंग सेंन्टर राज्यात अद्याप उभे होऊ शकले नाही. त्यामुळे कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बंद पडण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे, एलपीजी व इतर पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे, एकात्मिक ऊर्जा धोरणात नमूद केल्यानुसार स्वयंपाकासाठी आवश्यक ठरणारी ऊर्जा निर्माण करणे, रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यास लाभार्थींंना प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवनमान उंचावून त्यांना जाणवणारा त्रास कमी करणे, बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडून ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यासाठी मदत करणे आदी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या शंभर टक्के केंद्रपुरस्कृत योजनेची आखणी करण्यात आली. केंद्रशासनाच्या २0 कलमी कार्यक्रमात प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या या योजनेअंतर्गत कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बसविण्यासाठी सर्वसाधारण गटातील प्रतिलाभार्थी ९ हजार; तर अनुसूचित जाती, जमाती घटकातील लाभार्थीस ११ हजार रुपये अनुदान दिले जाते. शौचालयाला जोडलेल्या संयंत्रास १२00 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद आहे. याशिवाय लाभार्थी प्रशिक्षण ३ हजार रुपये, स्टाफ कोर्स १0 हजार, बांधकाम व देखभाल कोर्स ४५ हजार रुपये अनुदान दिले जाते. बायोगॅसच्या प्रचार व प्रसिद्धीवरही वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जातात; मात्र त्यानंतरही राज्यभरात १२ व्या पंचवार्षिक योजनेतून उभारल्या गेलेल्या कौटुंबिक बायोगॅस संयंत्र प्रकल्पांपैकी निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि अद्ययावत प्रशिक्षणाच्या अभावामुळे बंद पडली आहेत. महाराष्ट्र निर्मितीच्या ५५ वर्षाच्या मोठय़ा कालखंडात महाराष्ट्रात अद्याप एकही बायोगॅस डेव्हलपमेंट अँण्ड ट्रेनिंग सेंटर उभे राहु शकले नाही, हे यामागील मुख्य कारण मानले जात आहे.

*देशातील मोठय़ा शहरांमध्येच मिळतेय बायोगॅसचे प्रशिक्षण

देशातील ८ मोठय़ा शहरांमध्येच सध्या बायोगॅस डेव्हलपमेंट अँण्ड ट्रेनिंग सेन्टर कार्यान्वित आहे. त्यात गुवाहाटी, बँगलोर, इंदूर, लुधियाना, उदयपूर, कोईम्बतूर, दिल्ली आणि ओडिसा या शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कुठेही बायोगॅस संयंत्र प्रकल्प कार्यान्वित करायचा झाल्यास मध्यप्रदेशातील इंदूर येथील प्रा.एस.पी.सिंग संचालित केंद्र गाठावे लागते. यासाठी लागणारा पैसा केंद्रशासन पुरवित असले तरी ही बाब अनेकांना न परवडण्यासारखी नाही.

*आकड्यांमध्ये महाराष्ट्र नंबर वन!

सन २0१४-१५ मध्ये बायोगॅसच्या माध्यमातून राज्याने ३५७८ क्युबिक मीटर अपारंपरिक ऊर्जा निर्माण केल्याची माहिती आहे. देशातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, वेस्ट बेंगॉल, आसाम, मध्यप्रदेश, तामिलनाडू, ओडिसा आदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरुन सिद्ध होते; मात्र झपाट्याने बंद पडत असलेल्या कौटुंबिक बायोगॅस संयंत्र प्रकल्पांकडे वेळीच लक्ष पुरविले नाही तर महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्मितीत माघारायलादेखील वेळ लागणार नसल्याची वस्तूस्थिती आहे.