शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

महाराष्ट्रात अद्याप उभारले नाही बायोगॅस प्रशिक्षण केंद्र

By admin | Updated: October 7, 2015 22:57 IST

कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बंद पडण्याच्या प्रमाणात झाली वाढ.

सुनील काकडे/वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावागावात बायोगॅस प्रकल्प उभारण्याची गरज निर्माण झाली आहे; मात्र केंद्र शासनाचे १00 टक्के अनुदान उपलब्ध असतानाही अद्ययावत प्रशिक्षण देणारे एकही बायोगॅस डेव्हलपमेंट अँण्ड ट्रेनिंग सेंन्टर राज्यात अद्याप उभे होऊ शकले नाही. त्यामुळे कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बंद पडण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. स्वयंपाकासाठी बायोगॅस पुरविणे, एलपीजी व इतर पारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे, एकात्मिक ऊर्जा धोरणात नमूद केल्यानुसार स्वयंपाकासाठी आवश्यक ठरणारी ऊर्जा निर्माण करणे, रासायनिक खतांचा वापर कमी करुन सेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यास लाभार्थींंना प्रवृत्त करणे, ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवनमान उंचावून त्यांना जाणवणारा त्रास कमी करणे, बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडून ग्रामीण भागात स्वच्छता राखण्यासाठी मदत करणे आदी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन या शंभर टक्के केंद्रपुरस्कृत योजनेची आखणी करण्यात आली. केंद्रशासनाच्या २0 कलमी कार्यक्रमात प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या या योजनेअंतर्गत कौटुंबिक बायोगॅस संयंत्र बसविण्यासाठी सर्वसाधारण गटातील प्रतिलाभार्थी ९ हजार; तर अनुसूचित जाती, जमाती घटकातील लाभार्थीस ११ हजार रुपये अनुदान दिले जाते. शौचालयाला जोडलेल्या संयंत्रास १२00 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद आहे. याशिवाय लाभार्थी प्रशिक्षण ३ हजार रुपये, स्टाफ कोर्स १0 हजार, बांधकाम व देखभाल कोर्स ४५ हजार रुपये अनुदान दिले जाते. बायोगॅसच्या प्रचार व प्रसिद्धीवरही वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्ची घातले जातात; मात्र त्यानंतरही राज्यभरात १२ व्या पंचवार्षिक योजनेतून उभारल्या गेलेल्या कौटुंबिक बायोगॅस संयंत्र प्रकल्पांपैकी निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि अद्ययावत प्रशिक्षणाच्या अभावामुळे बंद पडली आहेत. महाराष्ट्र निर्मितीच्या ५५ वर्षाच्या मोठय़ा कालखंडात महाराष्ट्रात अद्याप एकही बायोगॅस डेव्हलपमेंट अँण्ड ट्रेनिंग सेंटर उभे राहु शकले नाही, हे यामागील मुख्य कारण मानले जात आहे.

*देशातील मोठय़ा शहरांमध्येच मिळतेय बायोगॅसचे प्रशिक्षण

देशातील ८ मोठय़ा शहरांमध्येच सध्या बायोगॅस डेव्हलपमेंट अँण्ड ट्रेनिंग सेन्टर कार्यान्वित आहे. त्यात गुवाहाटी, बँगलोर, इंदूर, लुधियाना, उदयपूर, कोईम्बतूर, दिल्ली आणि ओडिसा या शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात कुठेही बायोगॅस संयंत्र प्रकल्प कार्यान्वित करायचा झाल्यास मध्यप्रदेशातील इंदूर येथील प्रा.एस.पी.सिंग संचालित केंद्र गाठावे लागते. यासाठी लागणारा पैसा केंद्रशासन पुरवित असले तरी ही बाब अनेकांना न परवडण्यासारखी नाही.

*आकड्यांमध्ये महाराष्ट्र नंबर वन!

सन २0१४-१५ मध्ये बायोगॅसच्या माध्यमातून राज्याने ३५७८ क्युबिक मीटर अपारंपरिक ऊर्जा निर्माण केल्याची माहिती आहे. देशातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तरप्रदेश, वेस्ट बेंगॉल, आसाम, मध्यप्रदेश, तामिलनाडू, ओडिसा आदी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरुन सिद्ध होते; मात्र झपाट्याने बंद पडत असलेल्या कौटुंबिक बायोगॅस संयंत्र प्रकल्पांकडे वेळीच लक्ष पुरविले नाही तर महाराष्ट्र अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्मितीत माघारायलादेखील वेळ लागणार नसल्याची वस्तूस्थिती आहे.