शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अकोला जिल्हय़ात व्यवसाय कर न भरताच वीटभट्टय़ा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 02:10 IST

अकोला : मातीचे स्वामित्वधन बुडवणे, पर्यावरणाला घातक प्रदूषण करणार्‍या वीटभट्टी चालकांकडून व्यवसाय करही भरला जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही परवाना देण्यापूर्वी व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट असतानाही त्याकडे महसूल अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे येत आहे. 

ठळक मुद्देनाहरकत प्रमाणपत्र घेण्यातही महसूल विभागाची सूट

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मातीचे स्वामित्वधन बुडवणे, पर्यावरणाला घातक प्रदूषण करणार्‍या वीटभट्टी चालकांकडून व्यवसाय करही भरला जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही परवाना देण्यापूर्वी व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट असतानाही त्याकडे महसूल अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यात प्रदूषणकारी वीटभट्टय़ा सर्वत्र मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्याचवेळी वीटभट्टीधारकांनी इतरही मोठय़ा प्रमाणात अनियमितता करून शासनाच्या कोट्यवधींच्या महसुलाचे तर पर्यावरणाची अपरिमित हानी करण्याचे प्रताप सुरूच ठेवले आहेत. महसूल अधिकार्‍यांनी हेतूपुरस्परपणे या घोळाकडे दुर्लक्ष केलेले आहे. त्याबाबतच्या तक्रारी असतानाही कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता एकाचवेळी विविध कारवाईच्या कचाट्यात वीटभट्टीधारक अडकणार आहेत. विक्रीकर विभागाने नोव्हेंबर २0१४ मध्ये जिल्हाधिकार्‍यांना पत्र देत वीटभट्टीधारकांनी महसूल विभागाकडे कोणताही अर्ज केल्यास त्यानुसार परवाना देताना विक्रीकर विभागाचा व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी १ जानेवारी २0१५ रोजी सर्व तहसीलदारांना पत्र देत शासनाच्या व्यवसाय कराचे नुकसान टाळण्यासाठी विक्रीकर विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्याचे बजावले. व्यवसायकर भरण्यासाठी वीटभट्टीधारकांना कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र, विक्रीकर विभाग, जिल्हाधिकार्‍यांच्या पत्रानंतरही वीटभट्टीधारकांकडून विक्रीकर भरण्यासाठी कानाडोळा करण्यात आला. परिणामी, विक्रीकर विभागात वीटभट्टीधारकांची नोंदच झाली नाही. त्यामुळे व्यवसाय कर भरण्यालाही फाटा देण्यात आला. त्याचवेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या वीटभट्टीधारकांना माती खोदणे, वाहतूक करण्याचे परवाने असल्याने त्यांनी व्यवसाय सुरू केले. ते परवाने विक्रीकर विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय कसे देण्यात आले, हा मुद्दा आता पुढे येत आहे. एकूणच विक्रीकर विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या अनिवार्यतेकडे वीटभट्टीधारकांसोबतच महसूल अधिकार्‍यांनीही तेवढेच दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात वीटभट्टीधारकांकडून बिनबोभाटपणे शासनाचा महसूल बुडवला जात आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीण