शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठी सर्वोत्तम काळ  - ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 14:03 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.

अकोला : मागासवर्गीयांचे उद्योग उभारण्यासाठीचा सध्या सर्वोत्तम काळ असून, शासनाच्या ‘स्टँडअप’,‘मेक इन महाराष्टÑ’ ‘स्टार्टअप’ योजनेंतर्गत शेकडो मागासवर्गीयांनी उद्योग उभे केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक समतेचे स्वप्न साकार करण्याचा ‘डिक्की’च्या माध्यमातून हा अल्प प्रयत्न असल्याची माहिती दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी गुरुवारी येथे दिली.मागासवर्गीय उद्योजकांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कांबळे येथे आले होते. याप्रसंगी एका हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागासवर्गीयांचे (अनुसूचित जाती-जमाती) उद्योग उभारण्यासाठी ‘डिक्की’ सरकारच्या धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावत असून, उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पाठबळ उभे केले आहे. एवढेच नव्हे, उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ निर्माण केली असून, चार टक्के माल खरेदी करण्यासाठीचा कायदाच केल्याने २४ हजार कोटींची उत्पादने शासनाने खरेदी करणे अनिवार्य केले आहे. अनुसूचित जाती ,जमाती हब निर्माण केले. उद्योगांचे स्वरू प पाहून ५० लाख, ५० कोटींपर्यंतचे कर्ज उद्योग उभारण्यासाठी देण्यात येत आहे. देशात २७ सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत. या बँकांच्या १२५ शाखांमधून एका उद्योजकाला अर्थसाहाय्य केल्यास देशात १२५ नवे मागासवर्गीय उद्योजक निर्माण होतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीपासून पंतप्रधान यांनी ही योजना कार्यान्वित केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.राज्य शासनाने ‘मेक इन महाराष्ट्र’ योजनेंतर्गत प्रोत्साहन योजना सुरू केली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनेतंर्गत राज्यातील प्रत्येक औद्योगिक वसाहतीतीत (एमआडीसी) २० प्लॉट राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. आतापर्यंत १५ औद्योगिक वसाहतीमध्ये १२० मागासवर्गीयांना प्लॉट देण्यात आले असून,१० लाख रू पये अनुदान आहे.तसेच उद्योग उभारण्यासाठी २५ टक्के भांडवली गुतणवूकीसाठी अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मुद्रा योजनेंतर्गत १२ कोटी लोकांना ऋण देण्यात आले. सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत उद्योग उभारण्यासाठी मागासवर्गीयांमध्ये क्षमता बांधणीचे काम करण्यात येत आहे. महिला उद्योजकांना डिक्की प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलियम मंत्रालयांतर्गत तेल, गॅस वाहतूक व इतर कामे आता मागासवर्गींयाना मिळत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला अकोल्याचे उद्योजक सुगत वाघमारे, ‘डिक्की’चे जिल्हा समन्वयक रवींद्र घनबहादूर आदींची उपस्थिती होती.

 आता अकोल्यात पैठणीअकोल्यात पहिला पैठणी निर्मितीचा उद्योेग माधुरी गिरी यांनी सुरू केला असून, मिलिंद कांंबळे यांच्या हस्ते गुरुवार, ५ जुलै रोजी या उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले, यानंतर त्यांनी मेळाव्याला संबोधित केले.

 

टॅग्स :Akolaअकोला