शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कार्डविना मिळणार जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: May 12, 2014 00:06 IST

दारिद्रय रेषेवरील नागरिकांना दजेर्दार आरोग्यसेवा

शेगाव: दारिद्रय रेषेवरील नागरिकांना दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने २९ नोव्हेंबर २0१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. यामागील मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी हा आहे. मात्र अजुनही कित्येक पात्र लाभार्थ्यांना माहिती अपडेट न होऊ शकल्याने जीवनदायी कार्ड प्राप्त होण्यास विलंब होत आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड व आधारकार्ड असल्यासही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा, असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ तपासणी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटूंबांना कार्डवाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती ग्राह्य धरण्यात आली. मात्र संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहितीच अपडेट केली नाही. ज्या कुटूंबांचा डेटा अपडेट केला त्यातही घोळ असल्याचे समोर आले. यात एका कुटूंबातील नावे दुसर्‍या कुटूंबात गेल्याचे चित्र आहे. या कारणाने अनेकांना जीवनदायी योजनेपासून वंचित राहावे लागत होते. याची दखल घेत शासनाने अखेर शिधापत्रिका व आधारकार्ड असतानाही योजनेचा लाभ देण्याचा संबंधित कंपनी व जिल्ह्यातील रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता राशनकार्ड घेवून रुग्णालयात जाणार्‍यांनाही या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेवर नोंदणीची तारीख असणे बंधनकारक आहे. तशी नोंद नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन नोंदवून घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.