शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

कार्डविना मिळणार जीवनदायीचा लाभ

By admin | Updated: May 12, 2014 00:06 IST

दारिद्रय रेषेवरील नागरिकांना दजेर्दार आरोग्यसेवा

शेगाव: दारिद्रय रेषेवरील नागरिकांना दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने २९ नोव्हेंबर २0१३ पासून शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना लागू केली. यामागील मुख्य उद्देश आर्थिक दुर्बल घटकांना दजेर्दार आरोग्यसेवा मिळावी हा आहे. मात्र अजुनही कित्येक पात्र लाभार्थ्यांना माहिती अपडेट न होऊ शकल्याने जीवनदायी कार्ड प्राप्त होण्यास विलंब होत आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. त्यावर उपाय म्हणून आता रेशनकार्ड व आधारकार्ड असल्यासही योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात यावा, असा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नोव्हेंबर २0१३ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेंतर्गत ९७१ प्रकारच्या शस्त्रक्रिया, औषधोपचार व १२१ तपासणी उपचारांचा लाभ घेता येणार आहे. जीवनदायी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटूंबांना कार्डवाटप करण्यात आले. या माहितीसाठी शिधापत्रिकेची माहिती ग्राह्य धरण्यात आली. मात्र संबंधित विभागाने अशा कार्डधारकांची माहितीच अपडेट केली नाही. ज्या कुटूंबांचा डेटा अपडेट केला त्यातही घोळ असल्याचे समोर आले. यात एका कुटूंबातील नावे दुसर्‍या कुटूंबात गेल्याचे चित्र आहे. या कारणाने अनेकांना जीवनदायी योजनेपासून वंचित राहावे लागत होते. याची दखल घेत शासनाने अखेर शिधापत्रिका व आधारकार्ड असतानाही योजनेचा लाभ देण्याचा संबंधित कंपनी व जिल्ह्यातील रुग्णसेवा देणार्‍या रुग्णालयाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे आता राशनकार्ड घेवून रुग्णालयात जाणार्‍यांनाही या योजनेचा लाभ दिल्या जाणार आहे. विशेष म्हणजे शिधापत्रिकेवर नोंदणीची तारीख असणे बंधनकारक आहे. तशी नोंद नसल्यास तहसील कार्यालयात जाऊन नोंदवून घेणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.